शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

विक्रोळीत रस्त्यांची अक्षरश: चाळण

By admin | Published: July 23, 2016 2:08 AM

खड्डेमय बनलेल्या मुंबापुरीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच विक्रोळी परिसरात देखील रस्ता घोटाळा समोर येत आहे

मनीषा म्हात्रे,

मुंबई- खड्डेमय बनलेल्या मुंबापुरीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच विक्रोळी परिसरात देखील रस्ता घोटाळा समोर येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेकडून येथील रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे एक आमदार आणि दोन नगरसेवक विक्रोळी परिसरात आहेत. एवढी राजकीय वजनदार व्यक्तिमत्त्वे असूनही रस्त्यांची मात्र दुरवस्था आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या रस्त्यांवर तब्बल २८९ खड्डे मोजून काढले. विक्रोळी पूर्वेकडील स्टेशनलगत असलेला फाटक रोड पुढे पूर्व द्रुतगती मार्ग, कन्नमवार नगर, टागोर नगर या मार्गाला जोडला गेला आहे. या रस्त्यावर वाहनधारकांची प्रचंड वर्दळ असते. त्यात स्टेशन परिसरातच रिक्षा थांबा, बस थांबा असल्याने या गर्दीत भर पडते. शेअरिंग रिक्षांसाठीही नागरिकांची झुंबड उडते. तरीही या रस्त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष बाब म्हणजे हा रस्ता सेना आमदार सुनील राऊत, शिवसेना नगरसेवक विश्वास शिंदे आणि नगसेवक ताऊजी गोरुले यांच्या विभागांमध्ये येतो. शिवसेनेचे वजन असूनही या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांना वेळ मिळालेला नाही. अशात पालिकेकडूनच खासगी मजूर लावून या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केल्याचे दाखवले जात आहे. मात्र पावसाच्या एक-दोन सरींनी रस्ते पुन्हा पुन्हा खड्डेमय होत आहेत. आमदारांना वेळ नाही आणि नगरसेवक हद्दीच्या वादात गुरफटल्याने जायचे कुणाकडे, असा प्रश्न विक्रोळीकरांना पडला आहे. >‘नगरसेवकाचे ऐकून न ऐकणे’ : नगरसेवक विश्वास शिंदे यांना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने फोनवरून संपर्क साधून रस्त्यांबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला बोला म्हणणारे शिंदे यांनी नंतर मात्र हॅलो हॅलो म्हणून फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलणे टाळले. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या प्रतिक्रियेसाठी फोन केला असता, आवाज ऐकू येत नाही, असे त्यांनी सांगितले. तर नगरसेवक ताऊजी गोरुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत.>दोन ते तीन हजारांचा फटकारस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रतिमहिना दोन ते तीन हजारांचा फटका बसत आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळा यावर भर टाकण्यात आली. मात्र थोडासा पाऊस पडताच हे रस्ते आणखीन उखडत आहेत. याकडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नाही. -जयेश मिश्रा, रिक्षाचालक>खड्ड्यांबाबत प्रशासन गंभीर नाही मुंबईतील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयात २००२ पासून अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. न्यायालयाने वेळोवेळी अनेक निर्देश राज्य सरकार व महापालिकेला दिले. मात्र राज्य सरकार आणि महापालिका या आदेशांची अंमलबजावणी गांभीर्याने करीत नाहीत. आतापर्यंत उच्च न्यायालयाने तीन वेळा सरकार आणि महापालिकेला फैलावर घेतले आहे. प्रशासनाला याचे गांभीर्य असते तर प्रश्न केव्हाच निकाली निघाला असता. आता तरी प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. - जितेंद्र गुप्ता, रस्ते तज्ज्ञ>आमदार म्हणतात, पाठपुरावा सुरू आहे !फाटक रोडची परिस्थिती वेळोवेळी पालिकेच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. शिवाय येथील कोंडी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -सुनील राऊत, आमदार, भांडुप पूर्व, विक्रोळी विधानसभा मतदारसंघलेबरकडून काम करून घेतो ना !फाटक रोड पालिकेच्या अखत्यारीत असून जेव्हा खड्डे पडतात तेव्हा लेबरकडून काम करून घेतले जाते. गेल्या वर्षीच येथे पेव्हर ब्लॉकचे काम करून घेतले होते. मी सध्या वैद्यकीय रजेवर असून, कामावर परतल्यावर खर्चाची माहिती देतो.-नितीन गडईरे, अभियंता, एस वॉर्ड, रस्ते विभाग, विक्रोळी