शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

काळदरी पुलाचे काम रखडले

By admin | Published: July 12, 2017 1:29 AM

पुलाचे काम बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या रखडले असल्याने दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : काळदरी येथील धनकवडी रस्त्यावर थोपटेवाडीच्या ओढ्यावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुलाचे काम बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या रखडले असल्याने दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन तातडीने पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी काळदरी, बहिरवाडी, बांदलवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.काळदरी- धनकवडी रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतुक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी निधी मंजूर झाला. बांधकाम विभागाने तातडीने ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्षात दोन वषार्नंतर पुलाच्या कामास प्रारंभ करण्यात आला.सद्यस्थितीत जुना पूल पाडण्यात आलेला असून हंगामी स्वरूपात नळ्या टाकून रस्ता सुरू आहे. किरकोळ स्वरूपात पाऊस झाला तरी हंगामी रस्त्यावरून पाणी जात आहे. सद्या पिलरचे काम अपूर्ण असून उर्वरित काम रखडले आहे.पावसाळा तोंडावर असताना काम सुरू केलेले असून आतापर्यंत हे काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागात विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दुरुस्तीचे काम अपुर्ण असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.काळदरी हे गाव परींचे पासून १८ किमी अंतरावर आहे. शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बाजारपेठेत जाण्यासाठी, तसेच वीर येथे बँकेत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. गेल्या दोन वर्षात या पुलावरून वारंवार पाणी गेल्यावर अंशत: गैरसोय होत होती मात्र आता जुना पूल पाडल्यामुळे पयार्यी लगतच्या पुलाखाली असणा-या पाइप मोकळ्याच असल्याने धोका निर्माण झाला आहे. दळणवळणाची गैरसोय झाल्याने ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केली होती. सध्या याच पुलाच्या रखडलेल्या कामामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने एस. टी बसेस चालू आहेत. जोराचा पाऊस झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा डेपोच्या वतीने देण्यात आला आहे.