शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे जागतिक स्वच्छता दिन

By admin | Published: September 18, 2016 1:56 AM

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार

मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डतर्फे शनिवारपासून सुरू करण्यात आलेले ‘निर्मल सागर तट’ अभियान २ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व सागरी किनारे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जागतिक सागर तट स्वच्छता दिनाचे औचित्याने मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. काशीद समुद्र किनारी दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असून हा किनारा स्वच्छ व सुशोभित करण्याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणार आहे. मोहीमेसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ज्येष्ठ निरु पणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सहकार्य मिळवत असंख्य श्री सदस्यांचा सहभाग मिळवला. स्वछता मोहिमेत काशीद ग्रामस्थ, प्राथमिक शाळा रायगड जिल्हा परिषद काशीद, माध्यमिक विद्यालय काशीद येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता अभियानातून ५० टन कचरा गोळा करण्यात आला. (वार्ताहर)मोहीम अभियानापुरती मर्यादित राहू नये - तेलीअलिबाग : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून ही मोहीम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शनिवारी येथे केले. आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त निर्मल सागर तट स्वच्छता मोहिमेअंतर्गत, कोस्टगार्ड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, रायगड जिल्हा प्रशासन, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.जे. नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, अलिबाग प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे, मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन सुरज नाईक, कोस्टगार्ड कंमाडर रणजितकुमार सिंग, तहसिलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.