शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साहित्य संमेलनात लेखकांना मिळणार ‘मानाचं पान’; विविध साहित्य प्रकारांतील ५० पुस्तकांचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 07:23 IST

तीन दिवस प्रत्येक लेखकाला ठराविक वेळ देत प्रकाशन कट्ट्यावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात येणार

स्वप्नील कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वत:चे पुस्तक प्रकाशित व्हावे, ही प्रत्येक लेखकाची इच्छा असते. मात्र, ते जर साहित्य संमेलनात प्रकाशित झाले, तर तो त्या लेखकासाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखकांना ‘मानाचे पान’ मिळणार असून, तब्बल ५० लेखकांची विविध साहित्य प्रकारातील पुस्तके संमेलनादरम्यान प्रकाशित करण्यात येणार आहेत.

हा दुग्धशर्करा योग जुळून आणलाय संमेलनाची आयोजक संस्था ‘सरहद’ने. याबद्दल माहिती देताना साहित्य संमेलन आयोजक संस्था ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी सांगितले की, दिल्लीतील साहित्य संमेलनात राज्यातील विविध भागातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आमच्याकडे इतर प्रकाशकांकडून २५ आणि ‘चपराक’ प्रकाशनाचे २५ असे ५० प्रस्ताव आले आहेत. संमेलनामध्ये एका पुस्तक प्रकाशन  कट्ट्याचे नियोजन करण्यात येणार आहे. संमेलनादरम्यान तीन दिवस प्रत्येक लेखकाला ठराविक वेळ देत प्रकाशन कट्ट्यावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

विषयांचे वैविध्य हेच वैशिष्ट्य

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित होणं, हा लेखकांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सन्मान असतो. या पुस्तकांमध्ये विषयांची वैविध्यता आहे. मराठी भाषेतील वैविध्य भारतासमोर दाखवण्याची ही संधी आहे. यामुळे नवीन लेखकांची आणि विषयांची यानिमित्ताने ओळख होईल.

‘चपराक’ने वैविध्यपूर्ण विषय आणि पुस्तके निवडली आहेत. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची नाटकावरील तीन महत्त्वाची पुस्तके प्रकाशित करणार आहोत. कवी अनंतराव घोगले यांचा  मोडी आणि मराठीमधील कवितांचा पहिला द्विभाषिक कवितासंग्रह आहे. सुहास कोळेकर, संदीप वाकचौरे, जे. डी. पराडकर, चंद्रलेखा बेलसरे, जनार्दन देवरे, हिरालाल पगडाल आदींची प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य आदी पुस्तके प्रकाशित होणार आहेत.- घनश्याम पाटील, संपादक, चपराक, पुणे

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळPuneपुणे