शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र रहना चाहिए"; मनसेचा मोदी सरकारला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:04 IST

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ससंदेत विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर सर्व नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहिली. दिल्लीतील सदैव अटल समाधी स्थळावर केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि एनडीए नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. देशाच्या जडणघडणीत अटबिहारी यांचं मोठं योगदान आहे. आज त्यांची ९९ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियातूनही त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. 

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ससंदेत विरोधी पक्षांच्या तब्बल १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यावरुन, केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांचा संसदेतील एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या आणि तत्कालीन सरकारच्या कामकाजाची पद्धत सांगितली आहे. सरकार येईल, आणि जाईल. पक्ष बनतील आणि बिघडतील, पण हा देश राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही राहिली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहे. 

तत्कालीन पी.व्ही. नरसिंग राव यांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षातील नेते असतानाही अटबिहारी वाजपेयी यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून जेनिव्हा येथे पाठवण्यात आले होते. त्यावेळी, पाकिस्तानी आश्चर्यचकीत झाले होते, अशी आठवण वाजपेयी यांनी सांगितली होती, हे सांगतानाच त्यांनी देशात सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा दुवा कायम राहिला पाहिजे, असे म्हटले होते. त्यावरुन, मनसेनं विद्यमान मोदी सरकारला लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे.  

सत्ताधीश कुणीही असो पण आजमितीला किंचितही विरोधी आवाज सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. पण, हि अटलवाणी ऐकलीत तर कळेल कि, हिंदुस्थानचं राजकारण कधीच राजकीय सूडबुद्धीने पेटलेलं नव्हतं पण, आज...? असा प्रश्न मनसेनं विचारलं आहे. मनसेनं अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवरच हल्लाबोल केला आहे.  तसेच, राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ विरोधात असतानाही सत्तेच्या मोहापायी संयम न सोडणाऱ्या अटलजींच्या जयंतीला इतकीच प्रार्थना कि पुन्हा ह्या देशात विचारांचं, विवेकाचं, तात्विक विरोधाचं राजकारण रुजो, लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होवो, असेही मनसेनं अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना म्हटलं आहे. 

दरम्यान, भाजपाच्यावतीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत अटबिहारी वाजपेयी यांची ९९ वी जयंती देशभरात साजरी होत आहे. त्यांचे जुने व्हिडिओ, त्यांचे कोट्स शेअर करुन सोशल मीडियातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीMNSमनसेBJPभाजपाPakistanपाकिस्तान