शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

यंदा ४५ टक्के पाणीसाठा अधिक

By admin | Published: August 31, 2016 1:19 AM

पुणे जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये आजअखेर ८६.८१ टक्के म्हणजेच १८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पावसाच्या दडीमुळे याच सुमारास हे प्रकल्प केवळ ४१ टक्के भरले होते.

पुणे : पुणे जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये आजअखेर ८६.८१ टक्के म्हणजेच १८६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी पावसाच्या दडीमुळे याच सुमारास हे प्रकल्प केवळ ४१ टक्के भरले होते. त्या तुलनेत या पावसाळ्यात सर्व धरणांमध्ये मिळून ४५ टक्के पाणीसाठा अधिक आहे. पुणे जिल्ह्यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला हे धरण प्रकल्प मुठा खोऱ्यात, तर पवना, कासारसाई, मुळशी, कळमोडी, चासकमान, आंद्रा, भामा आसखेड, वडीवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर हे १२ प्रकल्प नीरा खोऱ्यात समाविष्ट आहेत. नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे आणि घोड हे प्रकल्प कुकडी नदीच्या खोऱ्यात आहेत. विसापूर आणि उजनी हे प्रकल्प भीमा खोऱ्यात आहेत.या सर्व धरणांची साठवण क्षमता २१५.३१ अब्ज घनफूट (टीएमसी) असून, आजअखेर या धरणांमध्ये ५२९१.६८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८६.९२ टीएमसी (८६.८१ टक्के) पाणी आहे. २५ पैकी १३ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाचे घटत जाणारे प्रमाण पाहता व उष्णतेचे वाढत जाणारे प्रमाण व पाणी वापर पाहता यापेक्षा अधिक साठा होण्याची शक्यता कमी आहे.सर्वाधिक पावसाच्या जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांमध्ये झालेल्या पावसाचे प्रमाण पाहता २०१३ मध्ये धरणांमध्ये सर्वाधिक ९७ टक्के पाणीसाठा असल्याचे दिसून येते. २०१२ पासूनच्या ४ वर्षांची तुलना केली असता : २०१५ व २०१२ या दोन वर्षांमध्ये आॅगस्टअखेरीस धरणांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी चिंताजनकच होती. २०१२ मध्ये ५८.८८, २०१५ मध्ये ४१.०५ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये होता. २०१४ मध्ये ८८.२१ टक्के पाणीसाठा होता.सर्वाधिक साठवण क्षमता (५३ टीएमसी) असलेल्या उजनी प्रकल्पात आजमितीस ६१ टक्के पाणीसाठा असून, दोन वर्षांनंतर या धरणात निम्म्यापेक्षा अधिक साठा असल्याने समाधानाचे वातावरण आहे.