शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

यावर्षी हापूस वधारणार!

By admin | Published: January 09, 2016 12:05 AM

थंडीची लाट : गारव्यामुळे झाडांच्या उत्पादनक्षमतेत वाढ

दापोली : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट उसळली असल्याने हापूस आंब्याला वातावरण पोषक आहे. यामुळे चालूवर्षी हापूसचे उत्पादन चांगले येईल, असा कयास बांधला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी हवेत चांगला गारवा टिकून आहे. वातावरणातील गारव्यामुळे झाडाची उत्पादनक्षमता वाढत असून, मोहोरधारणा होण्यासाठी वातावरण पोषक असल्याचे मत जिल्ह्यातील बागायतदार वर्तवित आहेत.पाऊस कमी झाल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंंतेचे वातावरण होते. परंतु सुरुवातीलाच पडलेल्या थंडीमुळे बागायतदार सुखावला आहे. दापोली परिसरातील फजल रखांगे या आंबा व्यावसायिकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पाऊस सुरू झाल्यापासून निगा राखावी लागते. खत टाकणे, औषधे फवारणी करणे यांसारखी कामे विशिष्ट वेळेत पूर्ण करावी लागतात. हवेत गारवा नसेल, तर झाडांवर रोग पडणे, मोहोर वेळेत न येणे, आल्यास लवकर काळा पडून फळ धारणा न होणे, अशा समस्या उद्भवतात. परंतु अपेक्षित थंडी असल्याने रोगांची शक्यता कमी होते, फळधारणा चांगली होते. खर्चही मर्यादित राहतो. चालू वर्षीचा हंगाम बागायतदारांना पोषक असल्याचे त्यांनी सांगितले. लाडघर येथील राजाराम झगडे या आंबा व्यावसायिकांनी सांगितले की, समुद्राजवळ असणाऱ्या झाडांना चांगली फळधारणा होण्याचे संकेत मिळत असून, दाभोळ, बुरोंडी, पंचनदी परिसरातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हर्णै येथील सागर मयेकर यांच्याशी संपर्क साधला असता सध्या आपल्या काही झाडांना चांगली कैरी दिसू लागली असून, उत्पादन योग्यवेळी हाती लागण्याची चिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले. विक्रांत मयेकर या आंबा बागायतदारांनी स्पष्ट केले की, डोंगरी चालू फळ यावर्षी बागायतदारांना दिलासा देणार असून, या हंगामात समाधानकारक उत्पादन मिळेल. आडे पाडले येथील आंबा बागायतदार अरूण लिमये यांनी सांगितले की, आंबा बागा थंडीमुळे चांगल्या बहरल्या असून, चालू वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न हाती लागण्याची शक्यता आहे. झाडावर आलेला सर्व आंबा काढून होईल की नाही, याची चिंंता त्यांनी बोलून दाखवली. (प्रतिनिधी)बागायतदारांना दिलासा : फळ पूर्ण होण्याची वाट पाहावीगुहागरमधील सुबोध जाधव म्हणाले की, निसर्ग अजून तरी बागायतदारांना दिलासा देत आहे. काही बागायतदार आपल्या बागा कराराने व्यावसायिकांना देतात. वातावरण पोषक असल्याने बागांचा करारही गतवर्षीच्या तुलनेत चढ्या भावाने केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. देवगड येथील बागायतदार भाई खानविलकर म्हणाले की, किमान १५ ते २० दिवस वातावरणात असाच गारवा राहिला तर बागायतदारांना समाधानकारक उत्पादन हाती लागेल. वि. र. हांडे यांची पेढी चालवणारे माणिक हांडे या आडतदारांनी सांगितले की, सध्या चित्र दिलासादायक असून, बागायतदारांनी फळ पूर्ण तयार होईपर्यंत वाट पाहावी, तोड लवकर झाली तर त्याचा दरावर विपरित परिणाम होऊ शकतो. आम्ही कसोशीने बागायतदारांसाठी विक्री करण्याचे काम करीत असून, चालू हंगाम चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. लहरी निसर्गाने अजून तरी बागायतदारांच्या बाजूने कल दिला असल्याने बागायतदार खुशीत असल्याचे चित्र आहे.चांगली आवकवाशी येथील आडतदार ल. पो. तांबे यांच्याशी संपर्क साधला असता चालू वर्षी चांगली आवक होण्याचे संकेत असून, योग्य वेळी फळ हाती लागले, तर बागायतदारांना चांगले पैसे मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.