शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

यंदा आंबा सामान्यांसाठी लवकर ‘गोड’ होणार

By admin | Published: February 01, 2016 12:58 AM

गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात जानेवारी महिन्यातच ६० पेटी रत्नागिरी हापूस दाखल झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच चालू हंगामातील आंब्याची आवक सुरळीतपणे सुरू होईल,

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात जानेवारी महिन्यातच ६० पेटी रत्नागिरी हापूस दाखल झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच चालू हंगामातील आंब्याची आवक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज फळबाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून सामान्यांना सहजपणे चाखता न येणारा आंबा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यताही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.रत्नागिरी येथील पावस गावातील शेतकऱ्यांच्या ६० आंब्याच्या पेट्या फळबाजारातील व्यापारी शिवलाल भोसले यांच्याकडे रविवारी दाखल झाल्या. गेल्या २० दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात आंब्याच्या पेट्या पुण्यात दाखल होत आहेत. परंतु, जानेवारी महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंबा दाखल झाला आहे. याबाबत शिवलाल भोसले म्हणाले, की यंदा आंब्याला पोषक असणारे वातावरण आहे. अवकाळी पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळे आंब्याचा मोहर गळून पडलेला नाही. त्यामुळे जानेवारीतच ६० पेटी आंबा बाजारात दाखल झाला. एरवी मार्च-एप्रिल महिन्यात आंब्याची आवक सुरू होते. परंतु, यंदा फेब्रुवारी महिना अखेरपासूनच आवक सुरू होण्याची शक्यता आहे, असे नमूद करून भोसले म्हणाले, की पावस येथील हापूस आंबा मोठ्या आकाराचा आणि दर्जेदार आहे. सध्या चार ते सहा डझनाला २ हजार ५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. आंब्याची आवक वाढल्यामुळे पुढील काळात आंब्याचे भाव कमी होतील. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना आंब्याची चव चाखता येईल. पावस गावातील आंबा उत्पादक शेतकरी भाई शिंदे म्हणाले, की माझ्या फळबागेतील आंबा आज पुण्यात दाखल झाला. फेब्रुवारी महिन्यात आंब्याची आवक सुरळीतणे सुरू होईल, असे काही व्यापाऱ्यांना वाटत असले तरी; झाडांना उशिरा पालवी फुटल्यामुळे यंदाही आंब्याची आवक मार्च महिन्यातच सुरळीतपणे सुरू होईल. काही झाडांना लवकर मोहर आला होता,अशा काही झाडांची फळे तोडून बाजारात आणली जात आहेत.