शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

येऊरचा विवेकानंद बालआश्रम संकटात

By admin | Published: August 13, 2014 3:07 AM

महिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे.

नामदेव पाषाणकर, घोडबंदरमहिला व बालविकास विभागाने आश्रमाची मान्यता रद्द केल्यामुळे १९८२ पासून अनाथ मुलांचे आश्रयस्थान बनलेला येऊर येथील विवेकानंद बालआश्रम संकटात सापडला आहे. आश्रमाच्या जागेवर बिल्डरांचा डोळा असल्याने नको ती कारणे दाखूवन तो बंद करण्याचा घाट काही कथीत राजकारण्यांनी प्रशासनास हाताशी धरून रचला असल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे आश्रमात शिक्षण घेणा-या ६५ विद्यार्थ्यांवर बेघर होेण्याची नामुष्की ओढवली आहे.निसर्गरम्य येऊर परिसरात ३२ वर्षापासून सदर आश्रम आर्थिक दुर्बल घटक विभक्त कुटुंब, आईवडिल नसलेले किंवा दोन्हीपैकी एक मयत असलेल्या कुटुंबातील अनाथ झालेल्या मुलांसाठी वरदान ठरला आहे़ या आश्रमाच्या आवारात मंदिर, गोशाळा असल्यामुळे धार्मिक वातावरणात ही मुले आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. आश्रम संस्था अनुदानित असली तरी आतापर्यंत शासनाकडून मात्र याला अद्याप अनुदान मिळालेले नसल्याचे विश्वस्तांचे म्हणने आहे. दानशूर लोकांनी दिलेल्या मदतीवर हा आश्रम सुरू आहे.आश्रमाची जागा केंद्र सरकारकडून ४० वर्षांच्या भाडेकरारावर घेण्यात आली आहे. ६ ते १८ वयोगटातील ६५ मुले गतवर्षापर्यंत येथे आश्रयाला होती़ मात्र, एप्रिलमध्ये आश्रमाची मान्यता रद्द केल्याचे पत्र संस्थेला मिळताच खळबळ उडाली होती. सरकारच्या या निर्णयामुळे सर्व मुलांना नाईलाजास्तव आश्रम सोडून जावे लागले होते. मुलांना मळकट कपडे, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि खेळाचे मैदान नसल्याचा ठपका ठेवून आश्रमाची मान्यता रद्द करण्यात आली. आश्रमाची मान्यता रद्द केली असताना तेथे जर मुले असतील ते कृत्य बेकायदा आहे. तसेच आश्रम संदर्भात मंत्री महोदयांनी विभागीय उपायुक्त कोकण विभाग, उपायुक्त बालविकास आयुक्तालयच, पुणे व उपमुख्य अधिकारी यांना १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले असल्याचे ठाण्याचे महिला व बालविकास अधिकारी शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.