शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:29 IST

मला चौकशीत कुठे कुठे गेला, कोणत्या देशात फिरला हे सर्व विचारण्यात आले असंही योगेश पांचाळ यांनी सांगितले.

पुणे - मूळचा नांदेड असलेला पुण्यातील इंजिनिअर तरूण योगेश पांचाळ २ महिन्यापूर्वी इराणमध्ये बेपत्ता झाला होता. भारत सरकारच्या प्रयत्नाने २ दिवसापूर्वीच तो मायदेशी परतला. इराण दौऱ्यावर गेलेल्या योगेशवर तिथे नेमकं काय झाले याचा खुलासा त्यांनी केला आहे. एका फोटोमुळे माणूस कसा अडचणीत येऊ शकतो हे योगेशसोबत घडलेल्या प्रकारामुळे सर्वांना कळून येईल. एक फोटो आणि इराणमध्ये ५९ दिवस डिटेक्शन सेंटरला योगेशला राहावे लागले. 

योगेश पांचाळने सांगितले की, इराणची राजधानी तेहरानला ५ दिवसांच्या दौऱ्यासाठी गेलो होतो. तिथे पोहचल्यानंतर मी हॉटेलला चेक इन केले. तिथे फ्रेश होऊन पर्यटनस्थळ असलेल्या मिलाद टॉवरला गेलो. त्याठिकाणी बरेच पर्यटक होते. तिथे मी बरेच व्हिडिओ, फोटो क्लिक केले आणि कुटुंबाला पाठवून दिले. कदाचित तिथे एखादं प्रतिबंधित क्षेत्र असू शकते. माझ्याकडून चुकून फोटो काढले गेले असतील. मी पहिल्यांदाच इराणला गेलो होतो. फोटो काढल्यानंतर मी भारतात माझ्या कुटुंबाला पाठवले. त्यानंतर मी पुन्हा हॉटेलला आलो तिथून पुन्हा १-२ पर्यटक स्थळी गेलो होतो असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या हॉटेलच्या बेडवर आराम करत असताना पोलीस तिथे आले आणि मला पकडले. त्यानंतर मला कारमधून डिटेक्शन सेंटरला घेऊन गेले. माझ्या डोळ्यावर कायम पट्टी बांधलेली असायची. ५९ दिवस मला तिथे ठेवले होते. मला पोलिसांनी हात लावला नाही, कुठलेही टॉर्चर केले नाही. मोठ्या आवाजातही बोलले नाही. सन्मानजनक वागणूक दिली. मला लागणाऱ्या सुविधा दिल्या. त्यांची प्रक्रिया होती. त्यानुसार ते करत होते. प्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी मला ५९ दिवसांनी थेट विमानतळावर आणून भारतात पाठवले असं योगेश पांचाळ यांनी सांगितले. 

दरम्यान, हा पूर्ण वेदनादायी काळ होता. माझा कुटुंबाशी कुठलाही संपर्क नव्हता. मी कुठल्या परिस्थितीत आहे, काय घडतंय हे माहिती नव्हते. मलाही कुटुंबाची माहिती मिळत नव्हती. आई आजारी असल्याने तिची खूप काळजी वाटत होती. मला चौकशीत कुठे कुठे गेला, कोणत्या देशात फिरला हे सर्व विचारण्यात आले असंही योगेश पांचाळ यांनी सांगितले.

कुटुंबाला लागली चिंता

५ तारखेला योगेश इराणला गेले, त्यादिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते कुटुंबाच्या संपर्कात होते. शेवटचा फोन केला तेव्हा ५ मिनिटाने फोन करतो सांगितले आणि ठेवला. त्यानंतर मी मेसेज केले. कॉल केले ते उचलले नाही. त्यानंतर २ दिवसांनी फोन स्विचऑफ झाला. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. आम्ही  ९ तारखेला दुतावासाला कळवलं. ११ तारखेला रिटर्न फ्लाईट होती त्यामुळे आम्ही वाट पाहिली पण तेव्हाही आले नाहीत त्यामुळे आम्ही मुंबईत आलो आणि भारत सरकारची मदत घेतली अशी माहिती योगेश पांचाळ यांच्या पत्नीने सांगितले.  

टॅग्स :IranइराणIndiaभारत