शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"तुम्ही आणि तुमची खुर्ची हाच तुमचा परिवार, बाकी आहे कुठे?", उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 22:40 IST

Uddhav Thackeray Criticize Narendra Modi: नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून आरोप करतात. मात्र तुमच्या तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

घराणेशाहीविरोधात नेहमीच बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली. नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून आरोप करतात. मात्र तुमच्या तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आम्ही इंडिया आघाडीची बैठक घेतली होती तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले की, ही विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, जरूर आहोत. पण आम्ही विरुद्ध आहोत ते हुकूमशाहाच्या विरोधात आहोत. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात आहोत. जेव्हा नरेंद्र मोदी तुम्ही आमच्या घराणेशाहीवर आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाश आंबेडकर यांच्या भाषेत बोलणार नाही. पण तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ही जी काही आपण आपली लढाई लढतोय, ती लोकशाही वाचवण्याची आहे. संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे. ज्या संविधानाबाबत शिवसेनाप्रमुख सांगायचे की, याची सुरुवात ही कोर्टापासून केली पाहिजे.   कोर्टामध्ये कुठल्याही धर्मग्रंथाऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला सुरुवात पाहिजे. पण आज भाजपाला घटना बदलायची आहे. यांना ४०० पार जागा त्याचसाठी पाहिजे आहेत. यांचे एक नेते अनंत कुमार हेगडे तसं म्हणाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

तसेच एका पक्षाला बहुमत मिळून सत्तेवर आलेलं सरकार चांगलं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, असं काही वेळा वाटायचं की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे. पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलं की, आपलं युतीचं सरकार होतं, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. सगळेच त्यामध्ये होते. एनडीएमध्ये छान वातावरण होतं. ममता, समता, जयललिता आपण सगळे एकत्र होतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं. त्यावेळी देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग फिल गुड अशी होती. मग मनमोहन सिंग यांनी चांगल्याप्रकारे सरकार चालवलं होतं. आता २०१४ पासून एका पक्षाचं सरकार आहे. २०१४ नंतर २०१९ आता २०१९ नंतर २०२४. आता म्हणताहेत की विरोधी पक्ष २०२९ मध्ये अडकलाय. मात्र मी २०४७ चा विचार करतोय. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशातील जनतेसमोर हुकूमशाह कितीही मोठा असला तरी ज्यावेळी सगळे लोक एकवटतात, तेव्हा हुकूमशाहाचा अंत होतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४