शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

"तुम्ही ग्राऊंड आर्मी तयार करताय, कोणाच्या कामी येईल...", 'अग्निपथ'वरुन आव्हाडांचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 4:19 PM

"आजपर्यंत काँट्रॅक्ट किलर शब्द ऐकला होता, पण आता काँट्रॅक्ट सोल्जर्स ऐकतोय.''

मुंबई:केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकमतशी खाच बाचतीत केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

'सैन्यात भरती होणे अतिशय अवघड'जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आजपर्यंत आपण देशात काँट्रॅक्ट किलर्स शब्द ऐकला होता, पण आता नवीन शब्द येतोय, काँट्रॅक्ट सोल्जर्स. सैन्यात भरती होणे अनेकांचे स्वप्न असते. निधड्या छातीचे पोरं सैन्यात जातात. निधड्या छातीने गोळ्या झेलून देशातील बांधवाना  सुरक्षित ठेवतात. त्यांची मानसिक आणि शारिरीक अवस्थात सुदृध असते, म्हणून त्यांना सैन्यात जागा मिळते. अतिशय अवघड प्रक्रियेतून हे पोरं जातात आणि त्यांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळते. अशाच पोरांनी भारताचा इतिहास रचलाय."

काँट्रॅक्टवर घेतलेली पोरं काम करतील?"भारताचे सैनिक पाकिस्तान, चीन, बाँग्लादेश सीमेवर तैनात असतात. हे सैनिक मायनस तापमानात काम करतात. इशान्येकडे असलेल्या घनदाड जंगलातून परदेशी घुसत असतात, तिकहे आपले सैनिक काम करतात. काश्मीरकडे पाकिस्तान, वर अफगाणिस्तान, इशान्येकडे चीन, बांग्लादेश, या देशांच्या सीमा लागल्या आहेत. सीलाँग चीनने ताब्यात घेतले आहे. अशा परिस्थितीत काँट्रॅक्टची पोर काम करू शकतील?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करताय'यावेळी आव्हाडांनी केंद्रावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "या पोरांना सहा महिन्यात तयार केले जाणार आहे. त्यांना तुम्ही शस्त्र चालवणे शिकवणार, आधुनिक तंत्रज्ञान असलेली हत्यारे चालवायला देणार. एकप्रकारे तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करत आहात. हे कोणाच्या कामी येईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्याप्रकारे गोरक्षक दल काम करते, त्याप्रमाणेच यांना पोरांना कामाला लावले जाईल," असा आरोप त्यांनी केला.

'...तर नोकऱ्या देऊ नका'"ज्या वयात पोरांनी अभ्यास केला पाहिजे, त्या वयात ही पोर आर्मीतून निवृत्त होणार. चार वर्षानंतर पोरांनी काय करायचं? देशातील तरुणांची चेष्टा करू नका. नोकरी देता येत नसेल, तर देऊ नका पण बेरोजगारांची टिंगल थांबवा. या योजनेमुळे मुलांचे भविष्यच राहिले नाही. केंद्राला आता सैन्य आता ओझ वाटायला लागलंय," असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDefenceसंरक्षण विभागCentral Governmentकेंद्र सरकार