शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

तुरीची शासकीय खरेदी सुरूच राहणार

By admin | Published: June 01, 2017 3:39 AM

राज्य शासनाच्या ३१ मे या दुसऱ्यांदा दिलेल्या अंतिम मुदतीनंतरही राज्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाच्या ३१ मे या दुसऱ्यांदा दिलेल्या अंतिम मुदतीनंतरही राज्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. मात्र मुदत संपलेली असली तरी राज्य शासनाच्या मार्फत तुरीची शासकीय खरेदी सुरूच राहील. शेतकऱ्यांची तूर पडून राहणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल. अशी ग्वाही पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मंगळवारपर्यंत राज्यात ५७ लाख क्विंटलची शासकीय तूर खरेदी झाली होती. विदर्भात अकोला जिल्ह्यातील पाचही नाफेड केंद्रांवर एक लाख ५२ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अकोला जिल्ह्यात ८०हजार क्विंटल खरेदी झाली. नागपूरमध्ये आतापर्यंत २८,९१६ क्विंटल एकूण खरेदी झाली. २० हजार क्विंटल माल खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. १९०० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील १३ केंद्रांवर १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची ४.५ लाख क्विंटल तूरीचे मोजमाप अद्याप बाकी आहे. वाशिम जिल्ह्यातील पाच नाफेड कें द्रांवर चार लाख ८३ हजार ६५३ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. ३० मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर यापुढेही खरेदी केली जाणार असल्याचे बाजार समितीच्या सचिवाने स्पष्ट केले.खान्देशात शेकडो क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, नंदुरबार व शहादा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू होते. हमदनगर जिल्ह्यात अडीच लाख क्विंटल खरेदी झाली, असे नाफेडचे जिल्हा विपणन अधिकारी जी.एन. मगरे यांनी सांगितले. मराठवाड्यातही माल पडूनउस्मानाबाद जिल्ह्यात १ लाख २६ हजार क्विंटल खरेदी झाली. सुमारे २ हजार शेतकऱ्यांकडे ६० हजार क्विंटल माल मापाविना पडून आहे. बीडमध्ये साडेचार लाख क्विंटल खरेदी झाली तर ४० हजार क्विंटल माल विक्रीस आला आहे. बुधवारी मुदत संपलेली असली तरी राज्य शासनाच्या मार्फत तुरीची खरेदी सुरूच राहील. शेतकऱ्यांची तूर पडून राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल. - सुभाष देशमुख, पणन व सहकार मंत्री