शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

युवा नेत्यांनीही गाजविले लोकसभेच्या प्रचाराचे मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 02:51 IST

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाने महाराष्ट्रातील प्रचाराची रणधुमाळी थांबली. एकीकडे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेते एकमेकांना भिडले असताना युवा नेत्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळत मैदान गाजविल्याचे यंदाच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळाले.

मुंबई : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाने महाराष्ट्रातील प्रचाराची रणधुमाळी थांबली. एकीकडे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेते एकमेकांना भिडले असताना युवा नेत्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळत मैदान गाजविल्याचे यंदाच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर आदी नेते चर्चेत होते.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी नियमित रॅली, सभा, प्रचारफेऱ्यांच्या जोडीने ‘आदित्य संवाद’ हा विशेष उपक्रम राबविला. पहिल्या टप्प्यात मुंबईसह पाच जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी सहा लाख युवकांशी थेट तर १५ युवकांशी डिजिटली संपर्क साधण्याचे उद्दिष्ठ ठेवले होते. नेहमीच्या राजकीय संवादाच्या स्वरूपाला या वेळी फाटा देण्यात आला होता. रॅम्प, चालत-बोलत साधलेला संवाद आणि उपस्थित युवा वर्गाकडून येणारे हरत-हेचे प्रश्न असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. मुंबईतील कार्यक्रमात तर त्यांना लग्न, डेटींगबाबतही थेट प्रश्न केला होता. प्रचार आणि अन्य कार्यक्रमादरम्यान अनेक लोक भेटत असतात. स्थळ वगैरे येतात का, पाहता का, लग्नाचे काय, असा सवाल करण्यात आला. त्यावर सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत आहे,‘आधी लगीन लोकसभा निवडणुकीचे आणि नंतर बाकी...’ अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न टोलविला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना आदित्य यांनी दिलेली उत्तरांचीही या प्रचारादरम्यान चर्चा झाली.

सुजात आंबेडकरांच्या निमित्ताने एक नवीनच नाव यंदाच्या प्रचारात समोर आले. प्रकाश आंबेडकरांच्या सोलापूर येथील प्रचाराची धुरा सुजातकडे होती. मुलाखती, भाषणे, प्रचार आणि राजकीय आरोपप्रत्यारोपातून प्रथमच सुजातची महाराष्ट्राला ओळख घडत होती. याशिवाय अन्य युवा नेतेही प्रचारात होते. यातील काही स्वत: उमेदवार होते तर काही संसदीय राजकारणात महत्वाची पदे अथवा जबाबदारी सांभाळत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक