शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

लोकल अपघातात तरुणाने गमावले पाय

By admin | Published: September 29, 2014 7:35 AM

रेल्वेरूळ ओलांडू नये, असे आवाहन उद्घोषणेद्वारे रेल्वे प्रशासनाकडून करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम अनेक प्रवासी करतात आणि अशा प्रवाशांना अखेर अपघाताला सामोरे जावे लागते

मुंबई : रेल्वेरूळ ओलांडू नये, असे आवाहन उद्घोषणेद्वारे रेल्वे प्रशासनाकडून करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम अनेक प्रवासी करतात आणि अशा प्रवाशांना अखेर अपघाताला सामोरे जावे लागते. अशाच एका २१ वर्षीय तरुणाला लोकलची धडक लागल्याने दोन्ही पाय गमवावे लागल्याची घटना टिळकनगर स्थानकाजवळ घडली. चेंबूर, आदर्शनगर येथे राहणारा नरेंद्र कोरवाल २७ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ चेंबूर बाजूकडील फूटब्रीजच्या खालून रूळ ओलांडत होता. त्याचवेळी एका लोकलने कोरवालला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याचे दोन्ही पाय वेगळे झाले व रुळावर तो बेशुद्धच पडला. घटनेची माहिती रेल्वे पोलीस आणि स्टेशन मास्तरला मिळताच त्यांनी तात्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले आणि त्यानंतर तेथून पुढे सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचे दोन्ही पाय गेल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याबाबत वडाळा रेल्वे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद धावरे म्हणाले, की लोकलमधून पडल्यास दोन्ही पाय गमावणे अशक्य आहे. हा अपघात रूळ ओलांडतानाच झाला आहे. (प्रतिनिधी)