शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

‘जलपरी’चे बिल घेतले परत!

By admin | Published: May 14, 2016 3:23 AM

रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत चार कोटी रुपयांचे बिल झाल्याचे सांगत तत्काळ दोन कोटी चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटताच

नितीन अग्रवाल, नवी दिल्ली दुष्काळाचे चटके सहन करत असलेल्या लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा केला खरा. पण, रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत चार कोटी रुपयांचे बिल झाल्याचे सांगत तत्काळ दोन कोटी चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटताच, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार हे बिल माफ करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत अखंड पाणीपुरवठा करत राहू असे आश्वासनही रेल्वेने दिले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, लातूर प्रशासनाने विचारणा केल्यामुळेच पाण्याचे हे बिल देण्यात आले. पण रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हे बिल आम्ही मागे घेतले आहे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. रेल्वेने तत्काळ टँकर मागवत ते सोलापूर आणि पुणे विभागात पाठविले आणि जलपरीची व्यवस्था केली. पहिले दहा दिवस लातूर आणि मिरजच्या प्रशासनाला पाइपलाइन टाकण्यासाठी लागले. त्यानंतर ५० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. आतापर्यंत रेल्वेने सहा कोटी लीटरपेक्षा अधिक पाणी पोहोचविले आहे. लातूरला पाणीपुरवठा केल्याबाबत रेल्वेने चार कोटींचे बिल दिल्यानंतर या प्रकारावर रेल्वेला टीकेला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने बिल परत घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जाते. बिल माफ झाले : जिल्हाधिकारी पांडुरंग पोले२३ दिवसांचे २.४ कोटी रुपयांचे बिल आले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे बिल भरण्यासंदर्भात कळविले होते. मात्र बिल रेल्वेने माफ केले असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले.पाण्याची गरज आहे, तोपर्यंत पाणीपुरवठा केला जावा. या प्रकरणात आर्थिक प्रश्नावरून अडवणूक होता कामा नये. - सुरेश प्रभू