शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला; पण समाधान झाले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 13:06 IST

26/11 Terror Attack: हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला.

- राकेश मारिया(माजी पाेलिस आयुक्त, मुंबई)हल्ल्यानंतर साधारण तीन आठवड्यांनंतर. दिनेश कदम आणि मी त्याची चौकशी करत होतो. त्याचा सहकारी इस्माइल जखमी झाल्याचे त्याला माहीत होते; पण तो मेल्याचे माहीत नव्हते. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याचा उद्धटपणा मला सहन होईनासा झाला.

‘चल माझ्याबरोबर. ऊठ,’ असे म्हणून मी उभा राहिलो. बाकीचे अवाक् झाले होते. ‘कुठे?’ त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला विचारत होते. पहाटेचे ३:३० वाजले होते. मी दिनेश कदमला एका बाजूला घेतले, आणि मला कुठे जायचे आहे ते त्याला सांगितले. त्याने वाहनांची व्यवस्था केली. काही मिनिटांतच, आमची फौज जे.जे. रुग्णालयाच्या शवागाराच्या दिशेने निघाली. कसाबला एका वाहनात सुरक्षितपणे ठेवलेले होते. जिथे त्याचे नऊ सहकारी फ्रीझरमध्ये चिरनिद्रा घेत होते, ती जन्नत. ‘ये देख! ये हैं तेरे जिहादी दोस्त जो जन्नत में हैं.’ मी म्हणालो. तो आ वासून बघतच राहिला.

तो वास असह्य आणि पोट ढवळून काढणारा होता. ते चेहरे भयंकर दिसत होते. एका अतिरेक्याच्या डोळ्यात बंदुकीची गोळी घुसली होती. काही जण फार वाईट रीतीने भाजले होते, आणि जळलेल्या मांसाचा उग्र दर्प हवेत भरून राहिला होता. ‘काय म्हणतात तुझे उस्ताद? सुगंध, हं? तेज? कुठे आहे सुगंध? कुठे आहे तेज? हा सुगंध आहे? हे तेज आहे?’ मी त्याला विचारत राहिलो. त्याच्याकडे उत्तर नव्हते. ‘जर तुझे उस्ताद म्हणतात की, जिहादमध्ये आलेला मृत्यू तुम्हाला जन्नतमध्ये घेऊन जातो, आणि तुमची शरीरे प्रकाशमान होतात आणि त्यातून सुगंध येतो, आणि पऱ्या तुमच्या सेवेला हजर असतात, तर ते स्वत: जाऊन जिहादमध्ये का मरत नाहीत? तुम्हाला का पाठवतात ते? कारण त्यांना इथल्या नरकाची मजा लुटायची असते म्हणून? त्यांना जन्नतमध्ये जाण्यात रस नसतो वाटतं?’ मी त्याला विचारले. त्याचा चेहरा पिळवटला, पांढराफटक पडला. उलटी होत असल्याप्रमाणे दोन्ही हातांनी पोट धरून तो जमिनीवर बसला.

आम्ही जेव्हा शवागारातून बाहेर पडलो, तेव्हा तो पूर्णपणे भांबावून गेल्याचे आणि त्याला धक्का बसला असल्याचे दिसत होते. फसवला गेलेला. भ्रमनिरास झालेला. आता मला जरा हलके वाटले. हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे, मेरी भड़ास बाहर निकल चुकी थी.

आमची फौज मेट्रो जंक्शनवर आली. काही दिवसांपूर्वीच या नराधमाने जिथे माझ्या प्रिय सहकाऱ्यांना आणि निरपराध शहरवासी बांधवांना ठार करत मृत्यूचे थैमान घातले होते, तोच पट्टा. माझ्यात पुन्हा काय संचारले माहीत नाही. मी सगळ्यांना थांबवले आणि माझ्या गाडीतून खाली उतरलो. त्यांना कसाबला बाहेर आणायला सांगितले. पहाटेचे ४:३० झाले असावेत. ‘खाली वाक आणि जमिनीवर डोके टेक’, मी कसाबला हुकूम केला. त्याने घाबरून निमूटपणे माझ्या आदेशाचे पालन केले. 

आता म्हण, ‘भारत माता की जय’ मी आज्ञा केली. ‘भारत माता की जय!’ कसाब म्हणाला. एका वेळेने समाधान झाले नाही, म्हणून मी त्याला आणखी एकदा म्हणायला लावले.(‘लेट मी से इट नाऊ’ या राकेश मारिया यांच्या पुस्तकातून साभार)

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाRakesh Mariaराकेश मारिया