शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

सगळं लक्षात ठेवण्याची गरज असते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 5:59 AM

आपण खूप वेळा ‘स्मरणात काय राहिलं?’ यावर चर्चा करतो. ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे,

आपण खूप वेळा ‘स्मरणात काय राहिलं?’ यावर चर्चा करतो. ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे, त्यांना नेहमीच खूप छान वाटतं. त्याचप्रमाणे ज्यांची स्मरणशक्ती खूप काही चांगली नाही, सारखं विसरायला होतं, अशांना वाटतं की आपल्याला फार काही आठवत नाही, म्हणजे आपल्यात काही तरी दोष आहे. काय करावं म्हणजे आपली स्मरणशक्ती तल्लख होईल? 

स्मरणशक्ती चांगली असणं हे चांगलंच असतं. पण आपल्यासाठी सगळ्या आठवणी मेंदूत ठेवणं शक्य नाही, हे आपल्या शरीरालाही माहीत असतं. म्हणून तर जन्मापासूनची प्रत्येक आठवण राहत नाही. 

दिवसभरात अनेक प्रसंग घडतात. त्यातले जास्तीत जास्त प्रसंग विसरले जातात. रस्त्यावरून जाताना जे काही दिसतं, ते लगेचच विसरलं जातं. कारण ते सगळं लक्षात ठेवण्याची गरज नसते.

रात्रीच्या झोपेत मेंदू दिवसभराच्या घटनांचे वर्गीकरण करायला घेतो. ज्या घटना पुढच्या काळात आवश्यक नाहीत असं वाटतं त्या सर्व डिलिट होतात. त्याचप्रमाणे ज्या घटना पुढच्या काळात गरजेच्या असू शकतात, त्या सर्व आठवणी मेंदूत शिल्लक राहतात. कोणत्या आठवणी ठेवायच्या आणि कोणत्या आठवणी आधी पुसट आणि मग डिलिट करायच्या, हे मेंदू ठरवतो.

त्यामुळे आजच्या दिवसात समजा आपण १६ तास जागृतावस्थेत आहोत, त्या कालावधीतल्या किती आठवणी त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी – तिसऱ्या दिवशी आठवतात? असे आपण जगलेल्या आयुष्यातील रोजचे दिवस बघितले तर एकूण किती अशा आठवणी आपल्याकडे असतात? खरं सांगायचं तर एकूण जगलेल्या आयुष्यातली फारच थोड्या, पण महत्वाच्या, नेमक्या आठवणी स्मरण केंद्रात असतात. या आठवणी आनंदाच्या असतात, दु:खांच्या, अपमानाच्या, कौतुकाच्या, मजेच्या असतात. तशाच कंटाळ्याच्या सुद्धा  असतात.

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे एक एक घटना असते. त्या सर्व लक्षात ठेवल्या जात नाहीत. प्रत्येक आठवण लक्षात ठेवणं हे मेंदूच्या दृष्टीने अवघड आहे आणि तसं अनावश्यकही. कारण त्या घटना तितक्या गरजेच्या नाहीत. म्हणून मेंदूने त्या डिलिट केल्या आहेत.

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com