शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

फेसबुकवरील पोस्टला राजकारण समजणे गाढवपणा

By संदीप प्रधान | Updated: April 10, 2023 09:18 IST

व्हर्च्युअल आणि रिअल अशा दोन प्रतलांवर वावरण्याच्या सध्याच्या काळात राजकारण हेही दोन्ही पातळ्यांवर लढले जाते.

व्हर्च्युअल आणि रिअल अशा दोन प्रतलांवर वावरण्याच्या सध्याच्या काळात राजकारण हेही दोन्ही पातळ्यांवर लढले जाते. सोशल मीडियावर विरोधी पक्षाच्या धोरणांवर, नेत्यांवर, आंदोलनांवर टीका-टिप्पणी करण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी ट्रोलर्सच्या टीम तयार केल्या आहेत. याखेरीज पदाधिकारी स्वत: उत्साहाने पोस्ट करतात. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी सातत्याने फेसबुकवर केलेल्या टीकात्मक पोस्टमुळे शिंदे गटामध्ये रोष होता. तोच उफाळून आला व त्यांना मारहाण केली गेली, असा शिंदे यांचा दावा आहे. दुर्दैवाने काही राजकीय पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावरील त्यांचा वावर हेच रिअल पॉलिटिक्स वाटू लागले आहे. त्यामुळे व्हर्च्युअल पॉलिटिक्स करणारे पदाधिकारी तेथे मिळणाऱ्या लाइक्सला जनाधार समजू लागले आहेत. हाच ट्रेन्ड बळावला तर भविष्यात लोकांमधील राजकीय पक्षाचे नामोनिशाण मिटेल.आपल्या प्रत्येकाची सध्या दोन प्रतलांवर ओळख आणि जगणे आहे. एक व्हर्च्युअल, तर दुसरी रिअल. रिअल लाइफमध्ये आपण जे आहोत तसेच आपण व्हर्च्युअल लाइफमध्ये आहोतच असे नाही. रिअल लाइफमध्ये आपण अनेक संकटांचा सामना करीत असलो, दु:खी असलो तरी व्हर्च्युअल लाइफमध्ये आपल्या त्या समस्यांचे पडसाद न उमटतील, याची काळजी अनेकजण घेतो. अर्थात अनेकांच्या मनातील वेगवेगळ्या कारणांमुळे असणारी खदखद ही व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर बाहेर पडते. अशावेळी राजकीय नेत्यांची विधाने, महागाई, हिंदुत्व, इतिहास वगैरे विषय हेच निमित्त असते.

गेल्या आठ वर्षांत सोशल मीडियाचे महत्त्व सर्वच राजकीय पक्षांना जाणवल्यामुळे ते प्रचाराचे मोठे साधन झाले आहे. भाजपने २०१४ च्या पूर्वीच देशभरातील ३० ते ३५ लाख व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपला विचार, संदेश पोहोचविणारे सदस्य पेरले आहेत. अन्य पक्षांनीही त्याचे अनुकरण केले आहे. सर्वच पक्षांनी आपल्या विरोधी पक्षाच्या प्रमुख दहा ते पंधरा नेत्यांच्या मागे ट्रोलर्सचा ससेमिरा लावून दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्याची लाइव्ह पत्रकार परिषद सुरू झाली, फेसबुक लाइव्ह सुरू झाले किंवा त्याने ट्वीट केले की, हे ट्रोलर्स अर्वाच्च भाषेत प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात करतात.   

रोशनी शिंदे आणि त्यांच्यासारखे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यात गैर काहीच नाही; परंतु, राजकारण म्हणजे दररोज फेसबुकवर चार-पाच पोस्ट केल्या, दिवसभरात डझनभर ट्वीट केली व व्हॉट्सॲपवर विरोधकांचा प्रतिवाद केला, एवढे मर्यादित नाही.  लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविले पाहिजेत. विषयांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. 

लाइक म्हणजे मोठी लोकप्रियता?   दुर्दैवाने फेसबुकवरील पोस्टला दोन-अडीच हजार लोकांनी लाइक केले म्हणजे आपल्याला मोठी लोकप्रियता लाभली, असा गैरसमज कार्यकर्ते करून घेतात. नेत्याची भलामण करणाऱ्या पोस्ट करणारे कार्यकर्ते हे नेत्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. त्यांनाच पदे दिली जातात. दररोज तिन्ही त्रिकाळ वाहिन्यांवर येऊन बाइट देणारे अलीकडे स्वयंभू नेते झाले आहेत. सोशल मीडियावरील लोकप्रियता हे अळवावरचे पाणी आहे. पक्ष व नेत्याने रिअल वर्ल्डमध्ये स्वत:ला भक्कम करण्याकरिता कष्ट घेण्याचा मार्ग कठीण असला तरी तोच योग्य मार्ग आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया