शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Tourism: यंदा तुमचं विमान चुकलंच !

By मनोज गडनीस | Updated: April 16, 2023 13:31 IST

Tourism: कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर गेल्या मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. सध्या तर अशी स्थिती आहे की, मागणी तुफान आणि पुरवठा मात्र मर्यादित. याचा थेट परिणाम म्हणजे विमान तिकिटाच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

- मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर गेल्या मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. सध्या तर अशी स्थिती आहे की, मागणी तुफान आणि पुरवठा मात्र मर्यादित. याचा थेट परिणाम म्हणजे विमान तिकिटाच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी सुट्टीत देशात वा परदेशात तुमच्या कुटुंबासह विमान प्रवासाचा काही बेत आखत असाल तर तुम्हाला उशीरच झाला आहे. विमान प्रवास किती महागला, का महागला, याचा वेध घेणारा हा सारांश...

विमान प्रवास का महागला ?गेल्या काही महिन्यांत अनेक नव्या मार्गांवर थेट विमान सेवा सुरू झाल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर विमान प्रवासाला प्राधान्य दिले आहे. फेब्रुवारीत एका दिवसात देशातील प्रवासी संख्येने ४ लाख ४० हजारांचा उच्चांक गाठला. सद्य स्थिती अशी की, मागणी प्रचंड आणि पुरवठा मात्र मर्यादित. पुरवठा मर्यादित असण्याची कारणे म्हणजे, स्पाईस जेट आणि गो एअर सारख्या कंपन्यांची काही विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरच आहेत. याची परिणती एकूण उड्डाणसंख्या कमी होण्यात झाली आहे. याखेरीज देशात जी नवीन विमानतळे विकसित झाली आहेत, तेथील ग्राऊंड चार्जेस आणि पार्किंग शुल्क यामध्ये तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. विमान कंपन्यांना हा खर्च सोसावा लागतो. त्यामुळे ही किंमत ते तिकिटाचे दर वाढवून ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात. याचाच प्रामुख्याने फटका विमान प्रवास महागण्याच्या रुपाने दिसून येत आहे. 

आता दिवाळीच्या सुट्टीचेच नियोजन करा...साधारणपणे सुट्यांच्या काळात कुटुंबासोबत जायचे नियोजन केले जाते, तेव्हा ते किमान तीन महिने आधी केले जाते. याचा थेट फायदा म्हणजे, तीन महिने आगाऊ बुकिंग केले तर विमान प्रवासाचे दर स्वस्त पडतात. कुटुंब म्हणजे किमान चार लोक जरी गृहीत धरले तरी जाऊन - येऊन ४० ते ५० हजार रुपये विमान तिकिटांसाठी खर्ची पडतात. 

अनेक लोक एकावेळी विमानाने आणि एकावेळी रेल्वे किंवा अन्य मार्गाने प्रवासाचे नियोजन करतात. यंदा मात्र, एकेरी मार्गाच्याच तिकिटांचा हिशोब केला; तर चार जणांच्या तिकिटांचा खर्च हा ७० ते ८० हजारांच्या किंवा त्याही पुढे जात आहे. 

त्यामुळे आगाऊ बुकिंग करायचे म्हटले तर तीन नव्हे तर सहा महिने आधी केल्यास किंचित फायदा होईल, असे दिसते. त्यामुळे उन्हाळी सुटीत विमान प्रवासाचे नियोजन आता फसले असले तरी आतापासून नियोजन करून दिवाळी सुटीसाठी बुकिंग करता येईल.

कुठून बुकिंग करायचे ?सध्या विमान, हॉटेल, पर्यटनाच्या ठिकाणी वाहन व्यवस्था किंवा तुमच्या टूरचे नियोजन करून देणाऱ्या अनेक वेबसाइट्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या कंपन्यांच्या व्यवहारांत एक मेख आहे. ती अशी की, त्यांना ज्या विमान कंपनीकडून अथवा हॉटेलकडून जास्त कमिशन दिले जाते, त्यांचीच माहिती अधिक ठळकपणे या वेबसाइट्स मांडतात. किती महागला?देशांतर्गत विमान प्रवास किमान २२ टक्के ते कमाल ४४ टक्क्यांपर्यंत महागला आहे. गेल्या मार्चपासून विमान प्रवासाशी निगडीत कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटले. त्यानंतर विमान कंपन्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता या कंपन्यांनी तिकिटांच्या किमतीमध्ये वाढ केली. मुंबई ते दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या तीन महिन्यांत या मार्गावरील विमान प्रवासात किमान २२ टक्के वाढ झाली आहे. मुंबई ते लेह या मार्गाची किंमत परतीच्या प्रवासासह तीन महिन्यांपूर्वी ९ हजारांच्या घरात होती. आता मात्र परतीचा प्रवास १९ हजारांच्या घरात आहे. विमान प्रवासाबद्दल सांगायचे तर; या वेबसाइट्सवरून केवळ मर्यादित स्वरुपाची विमाने दिसतात. त्यामुळे त्यापलीकडे जाऊन जर आपल्याला माहिती मिळवायची असेल तर थेट संबंधित विमान कंपनीच्या वेबसाइट्सवर जावे. तिथे अनेक विमानांची माहिती मिळू शकेल. आंतरराष्ट्रीय प्रवास स्वस्त आहे का ?रशिया आणि युक्रेन युद्धामुळे या दोन्ही देशांच्या हवाई सीमेवरून प्रवास जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक  विमान कंपन्यांना वेगळा हवाई मार्ग निवडावा लागला आहे.परिणामी, त्यांच्या वेळेत आणि इंधन खर्चात वाढ झाली आहे. ही वाढ ग्राहकांच्या खिशातून वसूल होत आहे. कोरोनामुळे अनेकांना परदेशात जाता आले नाही.त्यामुळे परदेशात जाण्यास उत्सुक लोकांची संख्याही मोठी आहे. युरोपात जाणाऱ्या विमान तिकिटांच्या दरात १२ टक्के वाढ झाली आहे, तर अमेरिका - आशियातील विमानाच्या तिकीटदरांत १० टक्के वाढ झाली आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स