शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जनमन: दहीहंडीच्या उत्सवाला खेळाचा दर्जा देणे हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 07:55 IST

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. भारतीय समाजामध्ये उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. भारतीय समाजामध्ये उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. मात्र, सार्वजनिक किंवा धार्मिक उत्सव याला खेळाचा दर्जा देणे, त्यामध्ये पाच टक्के आरक्षणाची घोषणा करणे ही गोष्ट क्रीडा क्षेत्रासाठी हानिकारक आहे.

१) कोणत्याही खेळाचे सामने आयोजित करण्यासाठी त्या संघटनेचे कामकाज किमान १२ जिल्ह्यांत असणे आवश्यक आहे.२) महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा प्रकारात आंतरशालेय सामन्यांमध्ये १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुला-मुलींचे संघ असतात. विद्यापीठ स्तरावरील सामन्यांसाठी वयाची अट २५ आहे.३) गोविंदा खेळामध्ये खालच्या दोन मनोऱ्यांमध्ये २५ ते ३५ वर्षांचे गोविंदा उभे राहतात. त्यानंतर तिसरा, चौथा थर चढविला जातो. यामध्ये वेगवेगळ्या वयाचे खेळाडू सहभागी होतात.  अशा स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक कशाच्या आधारावर काढले जातील? गुजरातसह संपूर्ण देशामध्ये गरबा हा सांस्कृतिक खेळ खेळला जातो. पुढे जाऊन गरबा या खेळाचा समावेशही क्रीडा क्षेत्रात करणार का? गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात ढोल वाजविण्यात येतात. ढोल वाजविण्याच्या प्रकाराला भविष्यात क्रीडा प्रकाराचा दर्जा देणे योग्य ठरेल का? ग्रामीण भागात श्रावण महिन्यात टिपऱ्या हा खेळ खेळला जातो. याला आपण बोली भाषेत खेळ म्हणतो. शासनाच्या क्रीडा धोरणामध्ये उत्सव आणि खेळ यामध्ये फरक करणे आवश्यक आहे.४) मुंबई उच्च न्यायालयाने १४ वर्षाखालील गोविंदांना चौथ्या मनोऱ्यावर चढण्यास बंदी घातली आहे.५) सर्वच राजकीय पक्षांनी उत्सवाला इव्हेंटचे स्वरूप दिलेले आहे. यामुळे उत्सव कमी आणि प्रदर्शन, प्रचार जास्त असेच चालले  आहे. राजकीय पक्षांना आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी असे प्रयत्न करावेच लागतात. कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सवाला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, त्याला खेळाचा दर्जा देणे चुकीचे वाटते.

- प्रशांत साठे, औरंगाबाद(या आशयाची पत्रे शंभू रोकडे, दत्तप्रसाद शिरोडकर, टिळक  उमाजी खाडे यांच्यासह अनेक वाचकांनी पाठवली आहेत.)

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी