शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

पहाडी आणि पठाराच्या संघर्षात लाभासाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:12 IST

उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत.

रवी टाले, कार्यकारी संपादक, जळगाव

उत्तराखंडमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने ‘ एलिट क्लास ’ शी संवाद साधा किंवा सर्वसामान्यांना बोलतं करा, त्यांच्या बोलण्यात हमखास दोन शब्द येतीलच ! पहाडी आणि मैदानी ! तसे प्रशासनाच्या दृष्टीने या राज्याचे दोन भाग पडतात. गढवाल आणि कुमाऊं ! दोन्ही प्रदेशांमध्ये पूर्वापार सुप्त संघर्ष चालत आला आहे ; पण हल्ली पहाडी-मैदानी सुप्त संघर्षानं त्या पूर्वापार संघर्षास मागं सारलं आहे, असं म्हणतात. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर राज्याच्या राजकारणात कुमाऊं भागातील नेत्यांचा वरचष्मा राहिला खरा, पण राजधानीचं शहर गढवालमध्ये, विकासकामे गढवालमध्ये जास्त, याचं शल्य कुमाऊंवासीयांना नेहमीच बोचत असतं. दुसऱ्या बाजूला तुलनेने छोटा प्रदेश, तसेच आमदारांची संख्या कमी असूनही कुमाऊं भागातील नेते वरचष्मा गाजवतात, याचं शल्य गढवालींना जाचतं ! दोन्ही प्रदेशांमधील हा सुप्त संघर्ष अद्याप ही जारी असला तरी, अलीकडं एक वेगळा संघर्ष प्रकर्षाने समोर आलायं. तो म्हणजे पहाडी व मैदानी !

उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत. हिमालय आणि शिवालिक पर्वतरांगांतील उंचावरील भाग म्हणजे पहाडी आणि पर्वतरांगांच्या पायथ्यालगतचा सखल भाग म्हणजे मैदानी ! हे दोन्ही भाग जसे गढवालमध्ये आहेत, तसेच ते कुमाऊंत देखील आहेत. दोन्ही भागांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ते दोन्ही भागातील लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत आहेत. जगण्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नसतं!

ज्येष्ठ पत्रकार गिरीश गुरुरानी म्हणतात, ‘ प्रादेशिक अस्मिता कितीही टोकदार असल्या, तरी जेव्हा रोजच्या जगण्याचे प्रश्न उभे ठाकतात, तेव्हा त्या थिट्याच पडतात’! पायाभूत सुविधांच्या अभावी पहाडी भागातून मैदानी भागात किंवा अन्य राज्यांत मोठ्या प्रमाणात स्थलांतर अव्याहत सुरु आहे. त्याचा थेट परिणाम मतदार संख्येवर होत आहे. ताज्या मतदार यादीनुसार, पहाडी भागातील मतदार संख्या घटली, तर मैदानी भागातील वाढली ! पहाडी भागातील १२ विधानसभा मतदार संघामधील एकूण मतदारांची संख्या आता ९० हजारांपेक्षाही कमी झालीय. हे असंच सुरु राहिलं तर, जेव्हा जेव्हा परिसीमन होईल, तेव्हा तेव्हा पहाडी भागातील मतदारसंघांची संख्या घटत जाईल. त्यामुळे पहाडी भागाचं राजकीय महत्त्व दिवसेंदिवस कमी होत जाईल आणि परिणामी पहाडी भागाकडे आणखी दुर्लक्ष होत राहील !

पायाभूत सुविधांचा अभाव ही पहाडी भागाची सर्वात मोठी समस्या आहे. स्वत: पहाडी भागातील असलेले गुरुरानी सांगतात, ‘ आजही स्त्रियांना प्रसूतीसाठी झोळी करून पायथ्याशी आणावं लागतं; कारण पहाडी भागात साधी प्राथमिक आरोग्य केंद्रही नाहीत. जिथं आहेत तिथं डॉक्टर नाहीत. असलाच तर आयुर्वेदिक फार्मासिस्ट असतो. त्याच्या आयुर्वेदिक औषधांनी गुण येण्यास बराच वेळ लागतो. दुसरीकडे झोलाछाप डॉक्टर ॲलोपॅथीचं औषध देतो, ज्यामुळं लवकर गुण येतो. त्यामुळं त्याच्याकडं जाण्याकडं कल असतो, पण मग कधीकधी त्याचे गंभीर परिणामही भोगावे लागतात.

उतारा राजधानी बदलण्याचा! उत्तराखंड राज्य अस्तित्वात आले, तेव्हा डेहराडून ही तात्पुरती राजधानी असेल, असं मान्य झालं होतं. उत्तराखंड हे पहाडी राज्य म्हणून अस्तित्वात आल्यानं, राजधानी पर्वतीय क्षेत्रातच असावी, अशी मागणी होती. आजही पर्वतीय क्षेत्रातील चमौली जिल्ह्यातील गैरसैन या पठारी प्रदेशाला राजधानी बनविण्याची मागणी होते. संपूर्ण शासकीय यंत्रणाच सहा महिन्यांसाठी गैरसैनमध्ये असली तरच त्याचा लाभ होईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. ज्येष्ठ पत्रकार कुशल कोठीयाल यांना मात्र हा युक्तिवाद मान्य नाही. ते म्हणतात, ‘संपूर्ण सचिवालय सहा महिन्यांसाठी गैरसैनला हलवायचं झाल्यास सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्येकी दोन निवासस्थाने उपलब्ध करून द्यावी लागतील. कारण मुलाबाळांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अधिकारी कुटुंब डेहराडूनमध्येच ठेवतील आणि स्वत:ही जास्तीत जास्त काळ डेहराडूनमध्येच घालवण्याचा प्रयत्न करतील. त्या परिस्थितीत पहाडी भागाचा विकास होणे तर दूरच, जे चाललंय त्याचा बट्ट्याबोळ होणं निश्चित आहे!’

पहाड़ो में जीना कितना मुश्किलोंभराडेहराडूनहून रेल्वेचा रात्रभराचा प्रवास करून भल्या सकाळी कुमाऊं भागातील हल्द्वानीला पोहोचलो, तर वैभव आर्या हा तरुण टॅक्सी ड्रायव्हर मला घ्यायला रेल्वे स्टेशनवर आला होता. तो पिथोरागढ जिल्ह्यातील पर्वतीय भागातील. हॉटेलला पोहोचेपर्यंत त्याला बोलतं केलं, तर गडी भरभरून बोलायला लागला. तो म्हणाला, ‘कुछ दिनों के लिए आकर पहाड़ो पर कुछ कहना, बोलना, लिखना बड़ा आसान होता है साहब. आप जैसे लोगो को पहाड़ लुभाता है, मगर पहाड़ो में जीना कितना मुश्किलोंभरा होता है, ये हम ही जाने! जो पहाड़ों पर रह रहे है, उनके रहने को जीना नहीं कह सकते. वे केवल मूल जरूरतों के लिए संघर्ष मात्र कर रहे है’. 

टॅग्स :Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२Uttarakhandउत्तराखंडElectionनिवडणूक