शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पावसाळी अधिवेशनातील तमाशाला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 05:47 IST

Maharashtra POlitics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेली हमरीतुमरी चर्चेचा विषय ठरला आहे.

- भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट विधान भवनाच्या पायऱ्यांवर जो काही प्रकार झाला, त्याला पूर्णपणे विरोधक जबाबदार आहेत. कारण त्यांनी गोंधळाला सुरूवात केली नसती तर आम्ही काहीच केले नसते. पहिले कोण बोलले, काय झाले ते बघा. मुळात आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत असताना त्यांनी तिथे यायला नको होते. विरोधक तीन दिवस पायऱ्यांवर आंदोलन करत होते, तेव्हा आम्ही आंदोलन करायला गेलो का? मग आम्ही आंदोलन करत असताना ते तिथे का आले? त्यामुळेच घडल्या प्रकाराला विरोधकच जबाबदार आहेत. पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत नव्हतो. आमच्यावर ‘पन्नास खोक्यां’वरून जी टीका होत होती, त्याला आम्ही जशास तसे उत्तर देत होतो. अशावेळी त्यांनी काहीही केले तर आम्ही बघत बसायचे का? आमचे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी तिथे यायला हवे होते, आम्ही तिथे दिवसभर बसणार नव्हतो. आमदारांसाठी आचारसंहिता आणणार असतील तर ती सगळ्याच आमदारांना लागू होईल. एकाच गटाला किंवा एका पक्षाला लागू होणार नाही ना? विरोधक जे काही बडबडत आहेत, त्यामुळे हे सगळे घडत आहे. सभागृहातील आचारसंहितेचा आम्ही भंग केलेला नाही. विरोधक चुकीचा दावा करत आहेत.

रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसएक तर सत्तेत असताना आमदारांना आंदोलन करण्याची काय गरज होती? ते कोणा विरोधात आंदोलन करत होते की, राजकीय स्टंट होता? आम्ही सत्तेत असताना आंदोलन केले नाही. लोकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ती जागा खरे तर विरोधकांना आंदोलन करण्यासाठी आहे. शिंदे-भाजप गटाचे १७ ते १८ आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. विरोधक तिथे रोज आंदोलन करतात. त्या दिवशीही आम्ही २० ते २२ आमदार आलो आणि पायऱ्यांवर मागे उभे राहिलो, काही वेळाने आमचे आणखी आमदार आले. जवळपास आमचे ६० आमदार आल्यानंतर जागा नसल्याने त्यातील काही आमदार शिंदे गटाच्या आमदारांच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यामुळे कदाचित शिंदे गटातील कुणाचा ‘इगो हर्ट’ झाला असावा.शेवटी आपण कुठे तरी कमी पडतो, ते काही लोकांना पचत नाही. त्यातील एक आमदार महेश शिंदे पुढे आले. आम्ही काहीच बोललो नाही. पण त्या गर्दीत जात असताना बहुतेक त्यांना कुणाचा तरी धक्का  लागला की, काय झाले माहीत नाही. त्यांनी थोडा आक्रमक पावित्रा घेतला. त्यात अमोल मिटकरीही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये जुंपली. पलीकडून थोडी शिवीगाळ झाली. सभागृहात आमदारांसाठी असलेली आचारसंहिता पाळत नाही, ही एक गोष्ट आणि बाहेरील वर्तनासाठी आचारसंहिता आणावी लागते हे महाराष्ट्राला शोभणारे नाही.शब्दांकन : दीपक भातुसे 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनPoliticsराजकारण