शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर जिल्ह्यात चार वर्षात बालकांचे हजारावर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:20 IST

नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात जन्मापेक्षा मृत्यू जास्त जिल्ह्यातील आरोग्याचे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे. त्याचबरोबर जन्मापेक्षा मृत्यूचा आकडा जास्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सांभाळली जाते. जिल्ह्यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र, ३३ आयुर्वेदिक दवाखाने व २५अ‍ॅलोपॅथी दवाखाने आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण नागरिक तथा रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने नोंदविलेली बालमृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. माता व बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. जिल्ह्यातील जन्मदर, मृत्यूदर याची माहिती अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळविली आहे.मुलींचा जन्मदर कमीच!४ वर्षांत एकूण २२ हजार १७३ मुलामुलींनी जन्म घेतला. २२१७३ पैकी ११६०६ मुले, तर १०५६७ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या तुलनेत मुली तब्बल १ हजार ३९ ने कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्याचबरोबर जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्याचे दिसून येत आहे. ४ वर्षांत एकूण ३१ हजार ८३७ नागरिकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यू