शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

तारक्कासह ११ जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले!

By संजय तिपाले | Updated: January 1, 2025 20:08 IST

आत्मसमर्पण: एका कोटींचे होते बक्षीस, मुख्यमंत्री म्हणाले, संविधान हाच खरा प्रगतीचा मार्ग

संजय तिपाले/गडचिरोली : तब्बल ३८ वर्षे नक्षल चळवळीत राहून सदस्य ते दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य अशी वाटचाल करत ६६ गुन्हे दाखल असलेल्या जहाल महिला माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य  भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ ताराक्का हिच्यासह ११ जणांनी १ जानेवारीला शस्त्र खाली ठेवले व संविधान हाती घेऊन सन्मानाने जीवन जगण्याचा प्रण केला.  तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर व चार दलम सदस्य यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचे आत्मसमर्पण झाले.

तारक्कासह विभागीय समिती सदस्य सुरेश बैसागी उउईके उर्फ चैतू उर्फ बोटी, कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी, अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश, एरिया  कमिटी सदस्य वनिता सुकलु धुर्वे उर्फ सुशीला ,  सम्मी पांडु मट्टामी उर्फ बंडी, उपकमांडर निशा बोडका हेडो उर्फ शांती, दलम सदस्य  श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना,  शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती, सोनी सुक्कु मट्टामी,आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते यांचा आत्समर्पण करणाऱ्यांत समावेश आहे. या सर्वांवर सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस होते. आता आत्मसमर्पणानंतर या सर्वांचे शासनाकडून पुनर्वसन होणार आहे. त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांना संविधान देऊन सन्मानाने जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलिस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलचे ‍लोकार्पण करण्याचे आले. तसेच येथील पोलीस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगर चे उद्घाटनही करण्यात आले.  विविध नक्षल चकमकींमध्ये शौर्य दाखविणाऱ्या सी-६० च्या   जवानांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलिस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे उपस्थित होते. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. संचालन उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांनी केले तर आभार अपर अधीक्षक बी. रमेश यांनी मानले.

माओवादी विचारसरणीला थारा नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरत्या वर्षात उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या ४ वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादी चळवळीत सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. ११ गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे.   न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. विकासात जिल्हा जसाजसा पुढे जात आहे तसा माओवाद पिछाडीवर जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली