शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

एवढा पाऊस पडूनही राज्यात १२०० गावे कोरडीच; ३५५ पैकी ७४ तालुक्यांत तूट

By निशांत वानखेडे | Published: March 23, 2023 11:28 AM

जलस्तर १ ते ३ मीटरपर्यंत घटला

नागपूर : २०२२ चा पावसाळा न विसरण्यासारखा आहे. महाराष्ट्राला पावसाने अक्षरश: झाेडपले आणि बहुतेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, एवढा पाऊस पडूनही राज्यातील अनेक तालुके मात्र सुकली आहेत. राज्यातील ३५५ पैकी ७४ तालुके प्रभावित असून ५८ तालुक्यांतील जलस्तर घटले आहेत व ११९६ गावे प्रभावित झाली आहेत. अहवालात नागपूर विभागाची स्थिती मात्र दिलासादायक आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे राज्यातील ५ मुख्य खाेऱ्यांचे १५३५ पाणलाेट क्षेत्रामध्ये विभाजन करून या परिसरातील पाणवहन, पुनर्भरण आणि साठवण उपक्षेत्रातील भूजल पातळीचे प्रतिनिधित्व करेल अशा ३९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यापैकी राज्यातील ३७०३ निरीक्षण विहिरींचे ऑक्टाेबरमधील भूजल पातळीच्या नाेंदीच्या आधारे संभाव्य पाणीटंचाईचा अभ्यास केला आहे. २०२२ मध्ये माहे सप्टेंबरमध्ये भूजल पातळीचा मागील ५ वर्षांतील माहे सप्टेंबर महिन्यातील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुसार ३७०३ पैकी ३०८९ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असून ६१४ विहिरींमध्ये सरासरीपेक्षा घट झाल्याचे आढळून आले आहे. ही घट चार गटांत विभागली आहे. त्यानुसार १ ते ३ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून येत आहे. जलस्तर घटण्याबाबत ठाणे, पुणे आणि नाशिक विभागातील जिल्हे प्रभावित आहेत. अमरावती विभागाचे ८ तालुक्यांतील १६२ गावे प्रभावित आहेत. नागपूर विभागाची स्थिती सर्वाधिक समाधानी असून केवळ ७ गावे प्रभावित असल्याचे दिसून येत आहे.

जलस्तर घटलेल्या गावांची स्थिती

*विभाग - प्रभावित तालुके - ३ मीटरपेक्षा अधिक - २ ते ३ मीटर - १ ते २ मीटर - १ मीटरपेक्षा कमी*

  • ठाणे - ८ - ० - ० - १०१ - १०१
  • पुणे - १४ - ११ - ७८ - १४४ - २३३
  • नाशिक - १५ - ०१ - ११ - १२० - १३२
  • छ. संभाजीनगर - ८ - ०० - ०६ - ३८ - ४४
  • अमरावती - १० - २४ - १८ - ३८ - ८१
  • नागपूर - ०३ - ०० - ०० - ०७ - ०७

एकूण - ५८ - ३६ - ११३ - ४४९ - ५९८

मुख्य गाेष्टी

  • राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८१ तालुक्यांत जलस्तर सरासरीपेक्षा वर. ७४ तालुक्यांत तूट.
  • ७४ पैकी ६० तालुक्यांत २० टक्के, १२ तालुक्यांत २० ते ३० टक्के व दाेन तालुक्यांत ३० ते ५० टक्के तूट (काेल्हापूर व सातारा जिल्हा)
  • पुण्याच्या ११ गावी व अमरावती विभागात अकाेल्यातील २४ गावांत जलस्तर ३ मीटरपेक्षा खाली आला.
  • ठाणे विभागात रत्नागिरीच्या ९२ गावांत जलस्तर १ ते २ मीटरपर्यंत घटला व ९२ गावांत १ मीटरपेक्षा कमी घटला.
  • नागपूर विभागातील ६३ पैकी केवळ ३ तालुके प्रभावित. यातील नागपूर व चंद्रपूरच्या १४ गावांत जलस्तर घटला पण नियंत्रणात.
टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानRainपाऊसnagpurनागपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात