शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

डॉ. आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२१ वर्षे; महामानवांच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 07:13 IST

डॉ. आंबेडकरांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली.

सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय शिक्षणाचा पाया ऐतिहासिक सातारा नगरीत रोवला गेला होता. त्यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी तत्कालीन गव्हर्नमेंट (प्रतापसिंह) हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. या घटनेला १२१ वर्षे पूर्ण होत असून बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन रविवारी राज्यभरात विद्यार्थी दिवस म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

डॉ. आंबेडकरांनी ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडविली. भारतीय राज्य घटनेचे ते शिल्पकार ठरले. बाबासाहेबांना लहानपणी भिवा म्हणत. शाळेच्या त्या वेळच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर भिवा रामजी आंबेडकर हे नाव व त्यासमोर बाबासाहेबांची स्वाक्षरी असून, हा दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या शाळेत बाबासाहेबांनी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. डॉ. आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा, अशी मागणी साताऱ्यातील अरुण जावळे यांनी शासनाकडे केली होती. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी अध्यादेश काढून ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे सरकारने आदेश दिले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होत आहे. परंतु हा दिवस राज्यात नव्हे तर देशात साजरा व्हायला हवा. या मागणीची राष्ट्रपती व पंतप्रधानांना सव्वा लाख पत्र पाठविली जाणार असून, आतापर्यंत ५० हजार पत्र पाठविली आहेत. युवा पिढीत बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठी, ती समृद्ध व बलशाली बनविण्यासाठी त्यांच्यात शैक्षिक नीतीमूल्ये जागृत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.- अरुण जावळे, प्रवर्तक, विद्यार्थी दिवस

राज्यपाल गणपतराव तपासे मार्गावरील प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेती संशोधन केंद्र व्हावे. शासनाने प्रतापसिंह हायस्कूलला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देऊन ही शाळा राज्य शासनाने चालवावी, अशी आमची मागणी आहे. - गणेश दुबळे, अध्यक्ष, प्रतापसिंह हायस्कूल विकास समिती, सातारा

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर