शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला तब्बल १५५ कोटींची सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:55 IST

नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता सक्षम प्राधिकरणाकडे सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचा फायदा घेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही रक्कम केवळ ८ कोटी रुपये करून राज्याच्या तिजोरीत येणाऱ्या १५५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. या प्रकरणी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देविखे पाटील यांनी मांडला भूखंड घोटाळा : नगरविकास राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला दिलेल्या भूखंडापोटी १६३ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले असता सक्षम प्राधिकरणाकडे सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचा फायदा घेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही रक्कम केवळ ८ कोटी रुपये करून राज्याच्या तिजोरीत येणाऱ्या १५५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. या प्रकरणी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विखे पाटील यांनी नगर विकास खात्याने केलेला हा घोटाळा सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यासने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा या संस्थेला दिलेल्या भूखंडावर वोक्हार्ट हे खासगी रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयाचा मागील १० वर्षातील व्यवसाय सुमारे १०० कोटींचा आहे. या भूखंडावर पूर्वी कमी भाडेपट्टी आकारण्यात आल्याने नागपूर खंडपीठाने सुधारित भाडेनिश्चिती करण्याचे आदेश दिले होते. नागपूर सुधार प्रन्यासने नवीन परिगणना करून या भूखंडाच्या व्यावसायिक वापरासाठी संबंधित संस्थांनी व्याजासह १६३ कोटी रुपये भरावे, असे निर्देश दिले. दरम्यान नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सक्षम प्राधिकरणाकडेच सोपविण्याचे निर्देश दिले होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एका खासगी रुग्णालय सुरू असलेल्या भूखंडाच्या भाडेपट्टीत हस्तक्षेप करायला नको होता. १६३ कोटी रुपये वसूल करायचे असताना नगरविकास मंत्री रणजित पाटील यांनी तब्बल १५५ कोटींची सूट दिली व फक्त ८ कोटी देय असल्याचे आदेश दिले. हा मोठा भूखंड घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला.नागपूर सुधार प्रन्यासकडून परिगणना होत असताना महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला सुनावणी देण्यात आली नाही, असेही राज्य सरकारच्या आदेशात नमूद आहे. परंतु, प्रत्यक्षात १८ नोव्हेंबर व ३ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या सुनावणीला संबंधित संस्था उपस्थित होत्या, असेही विखे पाटील यांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादली जाते आहे. तर दुसरीकडे एका फटक्यात तब्बल १५५ कोटी रुपयांनी कमी करून आर्थिक लाभ मिळवून दिला जात आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी, नागपूर सुधार प्रन्यासने ठरविलेल्या रकमेची तातडीने वसुली सुरू करावी व मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरविकास राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Vidhan Bhavanविधान भवन