शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

शाळाबाह्य १८० बालकांना शाेधण्यात यश

By निशांत वानखेडे | Updated: May 4, 2024 17:16 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभियान : शाळा प्रवेशाची प्रक्रिया निश्चित केली

नागपूर : जिल्ह्यात शाळाबाह्य मुले अत्यल्प आहेत, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात असला तरी त्यातील फाेलपणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष अभियानातून समाेर आला आहे. प्राधिकरणाच्या स्वयंसेवकाच्या विशेष पथकाने नागपूर जिल्ह्यात तब्बल १८० शाळाबाह्य मुलांचा शाेध घेण्यात यश मिळविले आहे. धक्कादायक म्हणजे त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.

नागपूर जिल्ह्यातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाचे सचिव न्या. सचिन पाटील यांनी तीन विधी स्वयंसेवकांचे पथक स्थापन केले आहे. यामध्ये विधी स्वयंसेवक मुकुंद अडेवार, मुशाहीद खान व राजरतन वानखेडे यांचे पथक जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांचा समावेश आहे. या पथकाने नागपूर शहर व ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या, झोपडपट्टी, आदिवासी पाडे आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये शाेध घेतला. मोहिमेत शहरातील १०२ व ग्रामीण भागातील ७८ अशा एकूण १८० शाळाबाह्य बालकांचा शाेध घेऊन शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली. त्यामध्ये कधीही शाळेत न गेलेले ५५ आणि मध्येच शाळा सोडलेले १२५ मुला मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३ मुले व २ मुली अपंग आहेत.

मुलींचे प्रमाण लक्षणीयसर्वेक्षण करतेवेळी शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे मुकुंद अडेवार यांनी सांगितले. या मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष भर देण्यात आला. तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देणेसाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गौतमनगर, गिट्टीगोदाम येथील दोन एकल पालक मुलींना शासनाच्या सावित्रीबाई फुले संगोपन योजनेची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधी स्वयंसेवक पथकाने मदत केली. तसेच मुलांकरीता असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजनांची देखील पालकांना माहीती देण्यात आली.

 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी