शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

२०२० पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 21:05 IST

चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण झालेले आहे. नकाशा मंजूर झाला असून स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. २०२० पर्यंत स्मारक उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : इंदू मिलच्या संपूर्ण जागेचे स्मारकासाठी हस्तांतरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या संपूर्ण साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण झालेले आहे. नकाशा मंजूर झाला असून स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. २०२० पर्यंत स्मारक उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी संपूर्ण साडेबारा एकर जमीन उपलब्ध झालेली नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. २५ एप्रिल २०१८ ला साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण होऊन त्यावर शासनाच्या नावाची नोंद झाली आहे. यातील पाच एकरातील भाग हा सीआरझेड अंतर्गत येतो, मात्र या परिसरात हे बांधकाम येत नाही. यालाही केंद्र शासनाची मान्यता घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, स्मारकाचे बांधकाम जोत्यापर्यंत आले आहे. पैशाची कोणतीही अडचण नाही. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात १५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध केला जाईल. स्मारकाचे काम हे आराखड्याप्रमाणे व संकल्पनेनुसार करण्यात येईल.विधिमंडळ सदस्यांपुढे या प्रकल्पाचे सादरीकरण हाईल का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तर भाई जगताप यांनी प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा सादरीकरणात असावा, अशी सूचना केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, विधिमंडळाचे सदस्य आणि सर्व आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांसमोर याबाबत सादरीकरण करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार आणखी बदल करण्यात येईल. शिवाय स्मारकाचे दर्शन सी लिंकवरूनही व्हावे, अशी व्यवस्थाही करण्यात येईल, यासाठी नियमित पाहणी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. चर्चेत सदस्य किरण पावसकर, संजय दत्त, अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस