शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नागपूर शहरात २६० इमारती धोकादायक; रहिवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 13:16 IST

काही ठिकाणी शिकस्त इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी असूनही कारवाई होत नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

नागपूर : शहरभर कधीही कोसळू शकतील, अशा २६० इमारतींकडे मनपा दुर्लक्ष करीत आहे. काहींना नोटीस तर, काही प्रकरणे न्यायालयीन असल्याचे कारण पुढे करीत पळवाट शोधली जात आहे. अशा परिस्थितीत कुर्ला येथील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती झाली तर जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर शहरात ४४२ शिकस्त इमारती आहेत. यातील ४४१ घरमालकांना मनपा प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. यातील १८२ घरे व इमारती पाडण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र यावर सर्वसामान्यांचा विश्वास नाही. प्रशासनाचा दावा खरा धरला तरी शहरात अजूनही २६० धोकादायक इमारती आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेक प्रकरणे न्यायालयात असल्याचे सांगितले जाते. वास्तविक न्यायालयात खरी भूमिका मांडून इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या वा व्यवसाय करणाऱ्यांच्या मृत्यूची प्रतीक्षा करण्यात येत असल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी शिकस्त इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी असूनही कारवाई होत नसल्याची माहिती आहे. आसीनगर झोनमध्ये असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आसीनगर झोनने दिलेल्या १० इमारतींच्या यादीतील सर्व इमारतींना नोटीस बजावली आहे. यातील एक पाडण्यात आली.

झोन कार्यालयांना अहवाल सादर करण्याचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा म्हणून मनपाच्या झोन कार्यालयांना त्यांच्या क्षेत्रातील शिकस्त घरांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. मात्र दरवर्षी पावसाळा आला की अशा इमारतींचा आढावा घेतला जातो. संबंधित विभागाला आदेश दिले जातात. प्रत्यक्षात पुढे कार्यवाही होत नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना