शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अजनी पुलाजवळील २७ दुकाने 'साफ'; नवीन केबल पुलाच्या निर्मितीसाठी मध्य रेल्वेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:46 IST

रामझुल्यासारखाच अजनीत केबल पूल : 'महारेल'कडे काम

नागपूर : अजनीमध्ये प्रस्तावित नवीन केबल पुलाचे निर्माण करण्यासाठी रेल्वे कॉलनीतील २७ दुकाने मध्य रेल्वेच्या इंजिनीअरींग विभागाच्या टीमकडून जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी रेल्वे पोलिस दलाने कडक बंदोबस्त लावला होता. ही दुकाने लीजवर देण्यात आली होती. मध्य रेल्वेने दुकाने खाली करण्यासाठी वारंवार नोटीस बजावल्या होत्या. अखेर बुधवारी सकाळपासून कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, रेल्वे पोलिस दलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या उपस्थितीत इंजिनीअरींग विभागाचे २० व रेल्वे पोलिसांच्या ५० जवानांच्या उपस्थितीत दुकाने तोडण्यात आली. अजनी पूल ते कम्युनिटी हॉल चौकदरम्यान २७ दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे आता पाच हजार चौरस फुटाची जागा रिकामी झाली आहे. ही जागा मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रशासनातर्फे अजनी केबल पुलासाठी ‘महारेल’ला देण्यात आली आहे.

- २२० मीटर लांब पूल, १९० कोटींचे टेंडर

१९२७ मध्ये इंग्रजांनी बनविलेल्या अजनी रेल्वे पुलाची स्थिती खस्ता झाली आहे. या पुलाच्या जागी राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातून रामझूल्याच्या धर्तीवर २२० मीटर लांब पूल बनविण्यात येत आहे. हा पूल रामझुल्याप्रमाणे केबलवर आधारित असेल. या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी महापालिकेने महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन म्हणजे महारेलला दिली आहे.

महारेलने २२० मीटर लांब अजनी केबल पुलाच्या निर्मितीसाठी १९० कोटींचे टेंडर काढले आहे. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच या प्रोजेक्टसाठी निधीची तरतूद अजून व्हायची आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर लगेच केबल पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे महारेलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

- दोन दिवस पूर्वीपासून कारवाईचे संकेत

दोन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे कॉलनीच्या दुकानदारांना दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. सोमवारी काही दुकानदारांनी आपली दुकाने खाली केली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात बातमीही प्रकाशित केली होती. तसेच उर्वरीत दुकानांवर लवकरच बुलडोजर चालविण्यात येईल, असे संकेतही दिले होते. अखेर मध्य रेल्वेने बुधवारी ही कारवाई केली.

- अनेक कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न

हे दुकानदार अनेक वर्षांपासून जमीन लीजवर घेऊन दुकान चालवित होते. बुधवारी झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांच्या चेहऱ्यांवर निराशा होती. त्यांचे म्हणणे होते की, दुकानांच्या भरोश्यावर १०० हून अधिक कुटुंबाचे घर चालत होते. आता त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात दुकानातील कर्मचारीदेखील आहे. दुकाने जमीनदोस्त झाल्याने त्यांचा रोजगार हिरावला आहे. सरकार व प्रशासनाकडून काही मदत झाली असती तर दुसरीकडे दुकान सुरू करून कुटुंबाचे पालनपोषण करता आले असते. आता आम्ही कुठे व्यवसाय करणार, असा सवाल येथील दुकानदारांनी केला.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर