शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

सहा महिन्यांत देशभरात ३१० बिबट्यांचा बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक ९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 10:36 AM

Nagpur News leopards भारतीय वन्यजीव संरक्षण साेसायटीच्या (डब्ल्यूपीएसआय) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, यावर्षी गेल्या फक्त सहा महिन्यांंत देशात ३१० बिबट्यांचे बळी गेले आहेत.

ठळक मुद्दे दर दाेन दिवसांनी एका बिबट्याचा मृत्यू

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्याघ्र संवर्धनाकडे जबाबदारीने लक्ष देतानाच इतर प्राण्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हाेत आहे की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण साेसायटीच्या (डब्ल्यूपीएसआय) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, यावर्षी गेल्या फक्त सहा महिन्यांंत देशात ३१० बिबट्यांचे बळी गेले आहेत. आणखी चिंताजनक म्हणजे यात सर्वाधिक ९५ मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत.

दाेनच वर्षांपूर्वी २०१८ मध्ये भारतीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढल्याची माहिती दिली हाेती. २०१४ मध्ये ७,९१० असलेली बिबट्यांची संख्या २०१८ मध्ये १२,८५२ वर पाेहोचली. मध्य प्रदेश व कर्नाटकनंतर १,६९० बिबट्यांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात बिबट्यांच्या मृत्यूत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश ४१, उत्तराखंड ३८, राजस्थान २४ आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० बिबट्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात १८० दिवसात ९५ म्हणजे दर दाेन दिवसांनी एका बिबट्याचा मृत्यू झाला. यामध्ये ५१ नैसर्गिक, ३६ अपघाती मृत्यू, तर दाेन बिबट्यांची शिकार झाल्याचे समजते.

महाराष्ट्रात ५ वर्षात झालेले मृत्यू

वर्ष मृत्यू             नैसर्गिक अपघाती

२०१६ ८९             ५३            २९ (७ शिकार)

२०१७ ८६             ५५            २१ (९ शिकार)

२०१८ ८८             ५४ २७

२०१९ ११०                         ३५ --

२०२० १७२             ८० ६४

 

अपघाती मृत्यू वाढले

गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिबट्यांच्या बाबतीत २०१८ पासून हा आकडा वाढलेला दिसताे. रस्ते व रेल्वे अपघात, खुल्या विहिरीत पडणे आणि श्वानांच्या हल्ल्यात मारले जाणे अशी कारणे आहेत. २०१८ मध्ये २७, २०१९ मध्ये ३५, तर २०२० मध्ये ६४ बिबट्यांनी अपघातात जीव गमावला. याशिवाय प्राण्यांचे अधिवास नष्ट हाेणे, मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक स्रोतांवर वाढलेला दबाव ही महत्त्वाची कारणे आहेत.

गेल्या सहा महिन्यात १५००० किलाेमीटरचे रस्ते रुंदीकरण झाले. जंगलातही रस्त्यांचे नेटवर्क प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जंगलातील गावांचेही शहरीकरण झाले. अतिक्रमण प्रचंड वाढले आहे. जंगलाचे क्षेत्र घटल्याने प्राण्यांना जागाच उरली नाही. बिबट्यांची संख्या वाढली म्हणतात, पण तेही भ्रम निर्माण करणारे आहे.

- प्रफुल्ल भांबुरकर, वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :leopardबिबट्या