शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

जिल्हा परिषदेचा ४५ कोटींचा निधी परत जाणार

By गणेश हुड | Published: May 31, 2024 7:00 PM

Nagpur : शासनाच्या स्थगितीचा विकास कामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागाने अखर्चित निधी ३१ मे पर्यंत शासन जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) जिल्हा परिषदेला मिळालेला जवळपास ४५ कोटींचा  अखर्चित निधी परत जाणार आहे. वर्ष २०२१-२२ मधील हा निधी आहे. राज्यातील सत्तातरानंतर विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. परिणामी हा निधी अखर्चित राहीला आहे. 

राज्यात सत्तातरानंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले.  सत्ताबदल होताच जिल्हा परिषदेच्या विकास कामांना  स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामांवर परिणाम झाला होता. जवळपास वर्षभरानंतर ही स्थगिती उठविण्यात आली.  त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी जवळपास १०० कोटींचा निधी अखर्चित होता. कालावधी कमी असल्याने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रीया याला वेळ लागत असल्याने उपलब्ध निधीपैकी ४० कोटींचा निधी कालावधीत खर्च करता आला नाही. 

अखर्चित निधी खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु त्याला शासनाकडून परवानगी मिळाली नाही. हा ४५ कोटींचा अखर्चित निधी आता हा अखर्चित निधी ३१ मे पर्यंत शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश वित्त विभागाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  एका विशिष्ट नमुन्यात अखर्चित निधीची माहिती पाठविण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व निधी शासनाकडे परत पाठवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे वर्ष २०२२-२३ मधीलही अखर्चित निधी परत पाठवावा लागणार असल्याची माहिती आहे.

१४४ कोटी जादाचे मंजूर पण खर्च होणार का? जिल्हा नियोजन समितीने २०२४-२५ या वर्षात १४४ कोटींचा जादाचा निधी मंजूर केला आहे. परंतु नियोजन समितीकडून उशिरा प्राप्त होणारे नियोजन, विकास कामांना देण्यात येणारी स्थगिती यामुळे निधी खर्च होत नाही. त्यामुळे जादाचा निधी मिळूनही उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर