शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

५८५ किलो हर्टसवर.. हे आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:02 IST

Nagpur News आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाइन रेडिओ, आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे.

ठळक मुद्देएफएमच्या दुनियेतही आकाशवाणीचा स्मृतिगंध अबाधितनागपूर आकाशवाणी केंद्राचा ७४ वा वर्धापनदिन

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तंत्रज्ञान कितीही बदलो, मीडिया कधीच लोप पावत नाही... हे म्हणणे आहे, आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन नाखले यांचे. नागपूर आकाशवाणीचे अर्काईव्हज अर्थात जुन्या आठवणींचा खजिना पाहिला की त्यांच्या या कथनाला दुजोरा मिळतो. स्मृतींच्या संग्रहाचा एवढा साठा क्वचितच कुणाकडे, कोण्या संस्थेकडे असेल. त्यामुळे, हे नुसते शासकीय स्थळ ठरत नाही तर लाखो मनांच्या प्रतिबिंबाचा वारसा ठरते.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे पहिले प्रसारण १६ जुलै १९४८ रोजी झाले. तेव्हापासून ते एफएम, ऑनलाइन रेडिओ, आदींच्या आधुनिक काळापर्यंत सुरू असलेली आकाशवाणीची वाटचाल नेत्रदीपक आहे. ५८५ किलो हर्टझ तरंग वारंवारिता असलेल्या या केंद्रावरून युवावाणी, विविध भारती, वृत्त विभाग, कृषी आदी विविध विभागांचे प्रसारण होत असते. आजही या केंद्रांवरून होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा गोडवा रसिक मनांमध्ये कायम आहे. आजही खेडोपाडी आणि शहरांत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य विनोबा भावे यांच्या निधनाचे थेट आवाजी प्रक्षेपण, लाइव्ह क्रिकेट समालोचन, अनेक घटनांचे वृत्तनिवेदन आणि त्यांचे कलेक्शन आजही आकाशवाणीकडे अर्काईव्हच्या स्वरूपात संग्रहित आहे.

कस्तूरचंद डागा यांनी दिली इमारत

इंग्रजांनी स्थापन केलेल्या भारतीय राज्य प्रसारण मंडळाचे १९३६ साली ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झाले. नागपुरात आकाशवाणी केंद्राची पायाभरणी आजच्या केंद्राच्याच ठिकाणी झाली. कस्तूरचंद डागा यांच्या मालकीच्या डागा इमारतीतच हे केंद्र सुरू झाले. ही इमारत आजही ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षित आहे.

दररोज किलोने यायची पत्रे

रेडिओ हे श्रवण माध्यम असल्याने कोण बोलतेय, हे कळत नव्हते. त्यामुळे, आवाजाचे प्रचंड फॅन फॉलोईंग असे. ‘माझं गाव माझं वावर’ या कार्यक्रमातील ‘खंडूजी’ हे पात्र इतके प्रसिद्ध होते की त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे. दररोज किलो-दोन किलो पत्र येत असत आणि त्यांची उत्तरे देणे कठीण होत होते. मात्र, उत्तरे देणे क्रमप्राप्त असे.

- प्रा. बबन नाखले, निवृत्त कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी नागपूर केंद्र

.................

टॅग्स :Aakashvani square Nagpurआकाशवाणी चौक