शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

६०:४० पॅटर्नला कात्री !

By admin | Published: May 12, 2016 2:54 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘६०:४०’ ही परीक्षा प्रणाली राबविण्याचा मानस होता.

अंमलबजावणीची शक्यता ‘५०:५०’ : विरोध लक्षात घेता प्रशासनाचा सावध पवित्रानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘६०:४०’ ही परीक्षा प्रणाली राबविण्याचा मानस होता. परंतु या प्रणालीसंदर्भात विद्यापीठ वर्तुळातूनच नाराजीचा सूर दिसून येत आहे. या मुद्यावरून कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन या परीक्षा प्रणालीबाबत फेरविचार करणार आहे. त्यामुळे पुढील हिवाळी सत्रापासून ही प्रणाली सुरू होणार की नाही यााबाबत ‘५०:५०’ टक्के शक्यता निर्माण झाली आहे.विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवरील ताण लक्षात घेता त्यात आमूलाग्र बदल करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. यासंदर्भात विद्वत् परिषदेत निर्णय घेण्यात आला व पुढील शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी करण्याचेदेखील ठरले. ‘६०:४०’ प्रणालीनुसार विद्यार्थ्यांच्या २ परीक्षा होतील. यातील ४० टक्के गुणांची परीक्षा ही महाविद्यालयाकडून घेण्यात येईल व त्यात विस्तारपूर्वक उत्तरे लिहिण्याची संधी असेल. विद्यापीठाकडून ६० टक्के गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेण्यात येईल.‘कॉपी’चे प्रमाण वाढण्याची भीती‘६०:४०’ प्रणालींतर्गत विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी परीक्षा ही वस्तुनिष्ठ राहणार आहे. विद्यार्थ्यांना अचूक उत्तरांना केवळ खूण करावी लागेल, असे प्रस्तावित होते. परंतु ग्रामीण भागातील केंद्रांवर यामुळे ‘मासकॉपी’चे प्रमाण वाढण्याची भीती आहे. संपूर्ण पेपरची ‘कॉपी’ केवळ काही मिनिटांत होणे शक्य आहे. विद्यापीठाला प्रत्येक परीक्षा केंद्रावर लक्ष देणे शक्य नाही. त्यामुळे या मुद्यावरदेखील प्रशासनातील अधिकारी विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.