शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक; ४ ते ५ पोलीस जखमी
2
बहुमत असेल तर नगरसेवक दाखवू शकतील नगराध्यक्षांना घरचा रस्ता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
3
‘बलात्कार करतो का’ म्हणत भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; बीड जिल्हा पुन्हा हादरला
4
आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील
5
जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा
6
सलमान खानच्या घरी येणार नवा पाहुणा? अरबाजची दुसरी पत्नी शूरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा
7
मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
8
शिक्षक भरती घोटाळा: शिक्षण खात्याचे डिजिटल पेंढारी
9
‘मंत्री, सचिवांनी ‘असे’ न्यायनिवाडे करू नयेत’, उच्च न्यायालयाचे मंत्र्यांना आदेश
10
शिक्षक भरती घोटाळा: मुख्याध्यापकाने पाठवलेला प्रस्ताव झाडाझडतीनंतर पोलिसांच्या हाती
11
Viral Video: कारच्या डिक्कीतून बाहेर लटकला हात; रील करण्याचे कारण तपासातून आले समोर
12
पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे
13
अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप
14
विशेष लेख: भारतीय राज्यघटनेतील ‘पूर्व-पश्चिमे’चा संगम!
15
चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान
16
न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई!
17
राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर
18
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: ईडीचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र
19
"काही लपवण्याचे कारण नाही, कुठलीही जुनी आठवण..."; राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे भाष्य
20
सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत

By निशांत वानखेडे | Updated: July 19, 2023 18:54 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली.

नागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली. मात्र आता या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाची प्रतीक्षा आहे. सत्र सुरू झाल्यानंतरही या शाळेत शिक्षकाची नियुक्ती झाली नाही. शिक्षक मिळावा म्हणून ग्रामस्थांना आता अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

उपराजधानीपासून ५० किलाेमीटरवर मालकापूर हे गाव आहे. गावात आदिवासी व भटक्या विमुक्तांची संख्या अधिक आहे. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर २०१६ साली येथे इमारत बांधून शाळा सुरू करण्यात आली. तेव्हापासून ती नियमित सुरू आहे. मात्र यावर्षी मे महिन्यात शाळेचे पूर्वीचे शिक्षक निवृत्त झाले. तेव्हापासून दुसऱ्याची नियुक्ती न झाल्याने शाळा व विद्यार्थी शिक्षकाविना पाेरके झाले आहेत. या शाळेत सध्या १५ विद्यार्थी आहेत. बहुसंख्य आदिवासी व भारवाड समाजाचे आहेत.सामाजिक कार्यकर्ते रामदास काेडापे यांनी सांगितले, गावातील ५० पालकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आधी खंड विकास अधिकारी व नंतर गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षकाच्या नियुक्तीसाठी निवेदन देण्यात आले. बुधवारी या पालकांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली व शिक्षक नियुक्तीची मागणी केली.

जंगल, डाेंगरातून कसा करावा चिमुकल्यांनी प्रवास?गट शिक्षणाधिकारी यांनी जवळच्या मिनेवाडा गावातील शाळेत मुलांना पाठविण्याची सुचना करीत त्यासाठी प्रवास भत्ता देण्याची हमी दिली. मिनेवाडा हे गाव मलकापूरपासून ६ किमी अंतरावर आहे. हा रस्ता जंगल, डाेंगरातून जाताे. ओढे-नाले ओलांडावे लागतात व वन्यप्राण्यांचाही वावर असताे. अशा रस्त्याने पहिली ते पाचवीपर्यंतच्या चिमुकल्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शाळा नाही की अद्याप गणवेश नाहीशिक्षक नसल्याने मलकापूरची शाळा बंद पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशही मिळाले नाही. दरम्यान मिनेवाडा शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांसह पालकांना त्यांच्या शाळेत बाेलावून पुस्तके वितरित केली पण गणवेश मिळाले नाही. दरराेज शाळेत जाण्यास अडचणी असल्याने या मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची शक्यता आहे. माेलमजुरी करणाऱ्या पालकांची वाहन व्यवस्था करण्याचीही स्थिती नाही.

आम्ही माेठ्या कष्टाने ही शाळा सुरू केली हाेती. आता पुन्हा ती बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लहान मुले दूरच्या शाळेत जंगलातून कसा प्रवास करतील? आदिवासी, भटक्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर करण्याचाच हा प्रकार आहे. शिक्षक नियुक्त करून मुलांचे शिक्षण सुरू करावे, ही विनंती. - रामदास काेडापे, सामाजिक कार्यकर्ता 

टॅग्स :nagpurनागपूरMalkapurमलकापूर