शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूर जिल्ह्यात ८३५ बोअरवेल निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:29 IST

यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.

ठळक मुद्देनव्या बोअरवेलसाठी आग्रह जिल्ह्याचा ३१ कोटीचा टंचाई आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवते. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत टंचाई आराखडा तयार करण्यात येतो.यंदा ३१ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. यात सर्वाधिक कामे ही बोअरवेलची आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ८,६०० बोअरवेल तयार करण्यात आल्या आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या नोंदीत ८३५ बोअरवेल निकामी ( निर्लेखित) झाल्या आहेत.जिल्ह्यातील ७६८ ग्रा.पं.अंतर्गत १५६० वर गावे आहेत. जर अशा परिस्थितीत प्रति गावाचा विचार केल्यास किमान पाच ते सहा बोअरवेल प्रत्येक गावांमध्ये आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्याचे इतरही स्रोत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा, विहीर, टँकरद्वारे पाणीपुरवठा आदींचा समावेश आहे. नवीन बोअरवेल खोदल्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. गतवर्षी जि.प.ने जवळपास ६९५ बोअरवेल खोदल्या होत्या.यंदाच्या टंचाई आराखड्यात पुन्हा ३ कोटी ४१ हजाराच्या निधीतून आणखी २६४ बोअरवेल खोदण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. बोअरवेलचा अतिरेक झाल्यामुळे भूगर्भातील पाणी खोल गेले आहे. नरखेड, काटोल तालुक्यांमध्ये त्याची झळ बसत आहे. त्यामुळे बोअरवेलला फ्लशिंग हा पर्याय समोर आला आहे. निर्लेखित बोअरवेलला पुनर्भरणाच्या दृष्टीने फ्लशिंग करून बोअरमधील गाळ, कचरा साफ करून बोअरवेलचे पुनर्भरण केल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा मर्यादित राहणार आहे.कळमेश्वर तालुक्यात फ्लशिंगचा प्रयोग यशस्वीगतवर्षी जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड व काटोल ही तालुके दुष्काळग्रस्त होती. त्यावेळी कळमेश्वर तालुक्यामधील जवळपास ४० वर गावांमध्ये सीएसआर फंडातून फ्लशिंगचा कार्यक्रम राबविण्यात आला आणि तो यशस्वीही ठरला. यामध्ये गोंडखैरी, घोराड, धापेवाडा, सिंधी आदी गावांचा समावेश होता. तर हिंगणा व मौदा तालुक्यातीलही १८-२० गावांनी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे फ्लशिंगसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता.बोअरवेल फ्लशिंगसाठी पुढाकार का नाही?जिल्ह्यात गावांच्या तुलनेत सहापटीने बोअरवेल जास्त आहेत. नवीन बोअरवेल खोदून भूगर्भाची चाळण होत आहे. या परिस्थितीत बोअरवेल फ्लशिंगसारख्या कार्यक्रमाला गंभीरतेने घेण्याची गरज आहे. परंतु बोअरवेलमुळे राजकारण्यांना आपली राजकीय पोळी शेकता येते, यामुळे ते जाणीवपूर्वक या फ्लशिंगसारख्या कमी खर्चाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणी