शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पंतप्रधान गोव्यात पोहोचले, पण नागपूरकर ‘पार्किंग’मध्येच अडकले; ढिसाळ नियोजनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 11:13 AM

केवळ पार्किंगमधून वाहने निघायलाच लागले अडीच तास

नागपूर : ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ ही म्हण एरवी नेहमीच वापरली जाते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ११ प्रकल्पांच्या लोकार्पण-पायाभरणी कार्यक्रमादरम्यान हजारो नागरिकांना ही म्हण प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. कार्यक्रम संपल्यावर पंतप्रधान गोव्याला रवाना झाले व तेथे पोहोचलेदेखील. मात्र एम्सच्या शेजारी असलेल्या वाहनांच्या पार्किंगमधून बाहेर निघायला लोकांना अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागले. हजारो नागरिकांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोक आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती. विदर्भातील विविध ठिकाणांहून लोक गाड्या व बसेसमधून नागपुरात पोहोचले. दुपारी एकच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान विमानतळाकडे रवाना झाले. तर लोक वाहनांकडे जाऊ लागले. ज्या ठिकाणी वाहने लावण्यात आली होती, त्या मैदानाला एकच एंट्री व एकच एक्झिट होती. त्यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे इतर नेतेमंडळी निघताच वाहतूक पोलिसदेखील सुस्तावले. समोर इतका मोठा गोंधळ दिसत असतानादेखील पोलिसांनी वाहने सुरळीत बाहेर काढण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. मैदानात शेकडो वाहने होती व अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलादेखील अन्नपाण्याविना वाहनांमध्ये बसले होते. परंतु वाहने एक इंचदेखील समोर सरकत नव्हती. यामुळे काही जणांमध्ये वाददेखील झाले.

अखेर पोहोचले पोलिस

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बसेसदेखील याच गर्दीत अडकल्या होत्या. दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गोंधळाची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर तेथे पोहोचले. त्यांनी त्या गोंधळातून वाहने काढण्यास सुरुवात केली. मात्र प्रचंड कोंडी झाली होती व त्यामुळे अनेकांना अडीच तासांहून अधिक वेळ अडकून रहावे लागले.

कार्यकर्त्यांमध्ये संताप

ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी आणले होते, ते या कोंडीच्या वेळी तेथून गायब झाले होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप होता. अनेकांनी सार्वजनिकपणे आपल्या भावना व्यक्तदेखील केल्या.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर