शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

'त्यांच्या' जीवनात फुलणार खरी 'स्वातंत्र्य पहाट', कुणी १० तर कुणी १२ वर्षानंतर उपभोगणार स्वातंत्र्याचा आनंद

By नरेश डोंगरे | Published: August 14, 2023 3:23 PM

१५ ऑगस्ट स्पेशल : 'ते' होणार मुक्त,

नरेश डोंगरे

नागपूर : क्षणिक रागातून निर्माण झालेल्या वादानंतर आक्रित घडले. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायव्यवस्थेने त्यांच्यावर आरोपी म्हणून ठपका ठेवला आणि पोलिसांनी त्यांना कारागृहात डांबले. त्यांचे स्वातंत्र्य हिरावले गेले. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या निर्दोष कुटुंबियांनाही सहन करावी लागली. गुन्हेगारी वृत्ती नसल्यामुळे कारागृहातील अट्टल गुन्हेगारांसोबत राहूनही ते मात्र गुन्हेगार नाही बनले. अशा अनेक गुन्हेगारांच्या जीवनात स्वातंत्र्यांची पहाट उगविणार आहे. होय, सरकारच्या एका योजनेनुसार, विदर्भातील विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या ६५ गुन्हेगारांना उद्या १५ ऑगस्टला कारागृहातून मुक्त केले जाणार आहे. त्यामुळे आता त्या ६५ बंदीवानांच्या जीवनात रोज खरीखुरी स्वातंत्र्याची पहाट फुलणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना इंग्रज सरकार कालकोठरीत टाकत होते. कारागृहाच्या भेसूर भिंतीआड डांबून त्यांच्यावर अणन्वित अत्याचार करीत होते. तो काळ गुलामीचा होता आणि त्यामुळे त्या काळात कारागृहात राहणाऱ्यांना समाजात वेगळा मान मिळत होता. आता मात्र कारागृहात राहणाऱ्यांविरुद्ध समाज तिरस्कृत नजरेने बघतो. कारण ही मंडळी समाजात राहून समाजकंटकांची भूमीका वठवित असते. कुणाच्या जानमालावर, अब्रूवर, संपत्तीवर वाकडी नजर ठेवून असते. त्यामुळे अशा समाजकंटकांना पोलीस न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कारागृहात डांबते. मात्र, कारागृहात डांबले जाणारे सर्वच गुन्हेगार असतात असेही नाही.

कारागृहात डांबल्या गेलेल्या अनेकांची वृत्ती गुन्हेगारांची नसते. त्यांची तशी मानसिकताही नसते अन् दुसऱ्या कोणत्या गुन्ह्यांचा त्यांचा रेकॉर्डही नसतो. 'त्यावेळी' क्षनिक संतापाच्या भरात त्यांच्या हातून गुन्हा घडतो. काही जण गुन्हा करणाऱ्यांच्या सोबत असल्यामुळे शिक्षेस पात्र ठरतात आणि त्यामुळे त्यांना कारागृहातील कोठडीत जावे लागते. अशा गुन्हेगारांना दिलासा देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरकारने २०२२ मध्ये एक योजना सुरू केली होती. त्यानुसार, उद्या १५ ऑगस्ट २०२३ ला राज्यातील एकूण १८६ तर, विदर्भातील ६५ बंदीवानांना पुढच्या शिक्षेत सुट देऊन कारागृहातून मुक्त केले जाणार आहे.

कारागृह आणि मुक्त होणारे बंदीवान

नागपूर मध्यवर्ती कारागृह : २३अमरावती मध्यवर्ती कारागृह : १९

अमरावती खुले कारागृह : ०५अकोला जिल्हा कारागृह : ०६

मोर्शी खुले कारागृह : ०१वर्धा खुले कारागृह : ०२

वर्धा जिल्हा कारागृह : ०१वाशिम कारागृह : ०१

भंडारा : ०१चंद्रपूर जिल्हा कारागृह : २

गडचिरोली कारागृह : ४

मुक्त होणारे एकूण बंदीवान : ६५

मुक्त होणारे अनेक बंदीवान पश्चातापाच्या भट्टीत पोळून निघाले आहे. ते आता जागरुक आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरतील, असा विश्वास वाटतो !

- गीता आगे, उपअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर.

टॅग्स :SocialसामाजिकIndependence Dayस्वातंत्र्य दिनjailतुरुंगnagpurनागपूर