शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

अमरावतीतून नागपुरात आलेला साहित्य संघ झाला अवघ्या विदर्भाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 16:11 IST

शतकमहोत्सवाची पूर्तता : १९९२-९३ पासून वाङ्मय पुरस्कारांना सुरुवात

नागपूर : विदर्भसाहित्य संघ, केवळ नावच पुरे आहे... कारण, ‘विदर्भविषय: सारस्वतीजन्मभू:’ असे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या संघाच्या इतिहासात बऱ्याच घडामोडी विस्मयकारी आणि काळाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटकसंस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या शेऱ्याशिवाय महामंडळाचे कुठलेच निर्णय पुढे जाऊ शकत नाहीत किंवा झालेले निर्णय फिरवरण्यात आल्याचा इतिहास आहे. विदर्भातील सारस्वत मंडळींसाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या इतक्या ताकदीची ही संस्था आज शंभर वर्षे पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे, हा इतिहासही रंजक आहे. मकरसंक्रमणाच्या मुहूर्तावर १४ जानेवारी १९२३ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने पहिली ३८ वर्षे कधीही वर्धापन दिवस साजरा केला नाही. नागपुरात संस्थेची इमारत तयार झाल्याने, तत्कालीन अध्यक्ष ना. रा. शेंडे यांच्या पुढाकाराने १९६१ मध्ये वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यास सुरुवात झाली आणि आज अव्याहतपणे ६२ वर्षे ही परंपरा सुरू आहे. १९९२-९३ पासून वाङ्मय पुरस्कारांना सुरुवात झाली आहे.

मार्चमध्ये सादर होणार ‘विदर्भातील नाट्यवाङ्मयाचा इतिहास’

- विदर्भ साहित्य संघाने गेल्या शंभर वर्षांत अनेक नवोदितांना जगापुढे आणले. त्यांच्या पुस्तकांना व्यासपीठ उपलब्ध करवून दिले. संघाच्या शतकपूर्तीच्या पर्वावर डॉ. विलास चिंतामण देशपांडे लिखित ‘विदर्भातील नाट्यवाङ्मयाचा इतिहास’ हा संशोधनात्मक ग्रंथ मार्चमध्ये प्रकाशित होण्याची शक्यता आहे. यासोबतच विदर्भ साहित्य संघाचा इतिहास, त्यातील रंजक घडामोडी, आदींवर आधारित साहित्यही याच काळात प्रकाशित होणार आहेत. विदर्भातील वाङ्मयाचा इतिहास, झाडीबोली कविता, साहित्य संघातील भाषणांचा संच जसाच्या तसा हेसुद्धा याच काळात प्रकाशित होणार आहेत.

स्थापना अमरावतीमध्ये, कार्यालय नागपुरात

- अण्णासाहेब खापर्डे यांनी अमरावतीमध्ये विदर्भातील सर्वांत जुन्या अशा या साहित्य संस्थेची स्थापना केली होती. त्यानंतर १९५० मध्ये संस्थेचे कार्यालय नागपुरात आणले गेले. सीताबर्डी, झांशी राणी चौक येथील पूर्वीचे धनवटे रंगमंदिर, हे विदर्भ साहित्य संघाचेच होते. १९९२-९३ मध्ये हे रंगमंदिर तोडून त्या जागी नवी बहुमजली वास्तू उभारण्यात आली आणि आता त्या वास्तूचे नाव विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुल असेच आहे. या इमारतीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यांवर धनवटे रंगमंदिराच्या जागी रंगशारदा नावाचे रंगमंदिर उभे झाले आहे. रंगमंदिराचे हे नामकरण संघाचे अध्यक्ष स्व. मनोहर म्हैसाळकर यांच्याच इच्छेवरून झाले आहे.

वाङ्मय पुरस्कार चढत्या क्रमाने

- विदर्भ साहित्य संघाने १९९२-९३च्या सुमारास वाङ्मय पारितोषिके प्रदान करण्यात सुरुवात केली. प्रारंभी संशोधन, कथावाङ्मय अशा प्रकारामध्ये पुरस्कार प्रदान केले जात होते. त्यानंतर १९९५ मध्ये पारितोषिकांची संख्या वाढविण्यात आली. १९९८ मध्ये ग्रेसांना पहिला जीवनगौरव ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार देण्यात आला होता.

विशेष म्हणजे, नागपूर आणि पुढे अमरावती विद्यापीठांतील पीएच.डी. पदवी धारण करणाऱ्यांचा सत्कार केला जात होता. सोबतच राज्य शासनाकडून वाङ्मय पुरस्कारप्राप्त विदर्भातील साहित्यिकांचाही सत्कार केला जात होता. असा सत्कार करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था होती. मात्र, कालांतराने हा सन्मान करणे बंद झाले.

टॅग्स :literatureसाहित्यVidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघVidarbhaविदर्भ