शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

'आपली बस'ला दोन वर्षापासून ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 15:10 IST

हैदराबादच्या एका कंपनीला १५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस द्याव्यात, अशी अट सप्टेंबरमध्ये महापालिकेने घातली होती. मात्र, कंपनीने एकदम ४० बसेस देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने आता टप्याटप्याने या बसेस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमनपाला टप्प्याटप्प्याने मिळणार बसेस केंद्र सरकारकडून मंजूर झाल्या होत्या १०० बसेस

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन वर्षे झाली तरी आपली बसला ४० इलेक्ट्रिक बसेसची प्रतिक्षा आहे.

हैदराबादच्या इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १५ नोव्हेंबरपर्यंत या बसेस द्याव्यात, अशी अट सप्टेंबरमध्ये महापालिकेने घातली होती. मात्र, कंपनीने एकदम ४० बसेस देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने आता टप्याटप्याने या बसेस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारच्या फास्टर अॅडॉप्शन अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग आॅफ हायब्रिड अॅण्ड इलेक्ट्रिक व्हेइकल योजनेत दोन वर्षापूर्वी नागपूर मनपाला १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या होत्या. यासाठी केंद्र सरकारकडून निधीही मिळणार होता. मात्र बसेसच्या संचालनावर मनपाला खर्च करावयाचा असल्याने मनपाने ४० बसेस चालविण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून १८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

सप्टेंबर महिन्यात मनपाने कपनीला या बसेस १५ नोव्हेंबरपर्यंत देण्याचा अल्टिमेटम दिला होता. तसेच् मनपाने एकूण हमी किमतीवर प्रतिदिन ०.१ टक्का दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता हा दंड लावायचा की, कंपनीला आणखी वेळ द्यायचा, हे कंपनीचे अधिकारी व आयुक्त यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

खर्च वाढणार म्हणून ४० बसेस

१०० इलेक्ट्रीक बस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडूनच निधी मिळणार होता. असे असले तरी बस संचालनाचा खर्च मनपाला करावयाचा आहे. आधीच बस संचालनावर दर महिन्याला ७ कोटी खर्च करावा लागतो. त्यात इलेक्ट्रीक बसेसमुळे दर महिन्याला आणखी एक कोटींचा खर्च वाढणार आहे. याचा विचार करता १०० ऐवजी ४० बसेस संचालनाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा उत्पादनांवर परिणाम

कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार करोनाकाळात बसेसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. करोनापूर्व काळात कंपनीकडून दररोज १२ इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करण्यात येत होते. मात्र, आता ही क्षमता चारपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे कंपनीला मागणीच्या तुलनेत बसेस देणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनPublic Transportसार्वजनिक वाहतूक