शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दहाच महिन्यांत 'अब तक ६८' हत्या; घटनांवर पोलिसांचे नियंत्रण नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:36 IST

किरकोळ वादांतून हत्यांचा निष्कर्ष : इतर घटनांबाबत अध्ययन काय?

नागपूरउपराजधानीतील वरिष्ठ अधिकारी ‘फेव्हरेबल’ आकडेवारी मांडून स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी प्रत्यक्षात नागपुरात हत्यांच्या घटनांसह गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे वास्तव आहे. जवळपास १० महिन्यांत नागपुरात ६८ हत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर पोलिसांचे अपयश स्पष्टपणे दिसून येत असताना पोलिसांनी एका अध्ययनातील निष्कर्ष मांडला आहे. किरकोळ वादांतून हत्या होत असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र, पोलिस अशाच प्रकारचे अध्ययन वाढते महिला अत्याचार, घरफोडी, चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांबाबत करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील वर्षभरात नागपुरात ६५ हत्यांची नोंद झाली होती व १०८ जणांना त्यात अटक झाली होती. यंदा जानेवारी ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ६८ जणांची हत्या झाली व ८० हून अधिक जणांना अटक झाली. पोलिसांनी या हत्यांचे अध्ययन केल्याचा दावा केला आहे. यातील ३३ हत्या किरकोळ वादातून घडल्या आहेत. कौटुंबिक कलह, प्रेमसंबंधात दुरावा किंवा जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय ही खुनाची दुसरी प्रमुख कारणे म्हणून समोर आली आहेत. मात्र, दहा महिन्यांत व्यावसायिक गुन्हेगारांच्या हातून २१ जणांची हत्या झाली आहे. १३ घटनांतील मयत आणि आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ६८ खुनाच्या घटनांपैकी ३४ अशा आहेत ज्यात आरोपींनी पहिल्यांदाच गुन्हा केला आहे. मात्र हत्या करण्यापर्यंत एखाद्या व्यक्तीची मजल जाते याचा अर्थ त्याच्या मनात कायद्याबाबत धाक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिला अत्याचार व गंभीर गुन्ह्यांचे काय?

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला अत्याचार तसेच गंभीर गु्न्ह्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. मात्र त्याबाबत पोलिसांचे कुठलेही अध्ययन समोर आलेले नाही. एकूण चोरी, वाहनचोरी, फसवणुकीच्या घटना, खंडणी यातदेखील मोठी वाढ झाली आहे. मात्र या घटनांची आकडेवारीच पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याने याबाबतची कुठलीही ‘फेव्हरेबल’ आकडेवारी समोर आलेली नाही.

हत्यांची कारणे

क्षुल्लक गोष्टीवरील वाद : ३३

प्रेम प्रकरण, चारित्र्यावर संशय, घरगुती कलह : १६

जुन्या वादाचे कारण : ८

पैसे किंवा मालमत्तेचे वाद : ८

दारू पिण्यावरून वाद : ३

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर