शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

स्वाधार योजनेतील ५ किमीची अट विद्यार्थ्यांसाठी ठरतेय जाचक

By आनंद डेकाटे | Published: February 02, 2024 5:24 PM

व्यावसायिक अभ्यासक्रमाची अनेक महाविद्यालये शहराबाहेर, गरजू विद्यार्थी लाभापासून वंचित. 

आनंद डेकाटे,नागपूर : बाहेर गावातून शहरात शिकायला येणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरिता समाज कल्याण विभागाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधेसाठी आर्थिक मदत केली जाते. परंतु या योजनेसाठी संबंधित विद्यार्थ्याने महानगरपालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश केलेला असावा, अशी अट आहे. नेमकी ही अट गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जाचक ठरत आहे. कारण अनेक महत्त्वाची व्यावसायिक अभ्यासक्रमाची महाविद्यालये शहराबाहेर ५ किमीपेक्षा अधिक अंतरावर आहेत. परिणामी गरजू विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

समाज कल्याण विभागाद्वारे सन २०१६-१७ मध्ये स्वाधार योजना सुरू करण्यात आली. त्यावेळेस शहरापासून २५ कि.मी. दूर असलेले महाविद्यालय निर्णयात घेण्यात आले होते. २०१६-१७ ला प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या शेकडो विद्यार्थ्यांना नव्याने सुरू झालेल्या या योजनेचा लाभ देण्यात आला. तद्नंतर नियमात बदल करून २०१७-१८ ला समाज कल्याण विभागाद्वारे शहरापासून २५ कि.मी. पर्यंतचे अंतर रद्द करून ५ कि.मी. करण्यात आले. त्यामुळे अक्षरशः अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सीईटी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सेन्ट्रल अॅडमीशन प्रोसेसच्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाद्वारे कॉलेज अलॉट करण्यात येते. विद्यापीठ प्रशासनाने निवडून दिलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असते. असे असतांना अलॉट करण्यात येणारी व्यवसायिक अभ्यासक्रमाची जवळपास बरीच महाविद्यालये ही शहरापासून ५ कि.मी. च्या बाहेर असल्याने गरजू विद्यार्थी लाभापासून वंचित झाला आहे. त्यामुळे ५ किमी च्या जाचक अटीने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता शासन-प्रशासनाने ५ किमी ची अट तत्काळ रद्द करावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनाद्वारे केली जात आहे.

आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचा हा डाव तर नाही ना? अशी शंका येते. शासन व प्रशासनाला खरच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे असे वाटत असेल तर त्यांनी ही जाचक अट रद्द करावी.आशिष फुलझेले, सचिव , मानव अधिकार संरक्षण मंच

टॅग्स :nagpurनागपूरStudentविद्यार्थी