शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पीडितांच्या कुटुंबीयांना फोन करीत आहे आबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:18 AM

नागपूर : पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे भयभीत झालेला कुख्यात गुन्हेगार आबू खान आता पीडित व्यक्तींना शांत व्हा, अशी विनवणी करीत ...

नागपूर : पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे भयभीत झालेला कुख्यात गुन्हेगार आबू खान आता पीडित व्यक्तींना शांत व्हा, अशी विनवणी करीत आहे. आबूने दोन दिवसांपूर्वी एका तक्रारकर्त्या महिलेच्या कुटुंबीयांना फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितले. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. नागरिकांना धमकी देऊन दोन दशकांपासून दहशत पसरविणाऱ्या आबूला पहिल्यांदा अशा प्रकारे विनवणी करावी लागत असल्यामुळे पोलिसांचा दरारा सिद्ध झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने आबू टोळीची पाळेमुळे खोदण्याच्या कामाला लागले आहेत. आतापर्यंत सक्करदरा ठाण्यात आबू टोळीविरुद्ध हप्तावसुली, जमिनीचा ताबा घेणे, धमकी देणे, मारहाण, तसेच गुन्हेगारी षडयंत्राच्या पाच घटना दाखल झाल्या आहेत. आबूच्या टोळीतील सदस्य फरार आहेत. त्याचा भाऊ नसीम उर्फ छोटू खानच गुन्हे शाखेच्या हाती लागला. पोलिसांवर विश्वास पटल्यामुळे आबू टोळीपासून त्रस्त असलेले पीडित स्वत:हून तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. ताजाबाद दरगाहशी निगडित एका व्यक्तीने आबू टोळीविरुद्ध तक्रार दिली आहे. त्याची माहिती मिळताच, आबूचा भाऊ अमजदने तक्रारकर्त्याला फोन करून शिवीगाळ करून धमकी दिली. त्याची माहिती मिळाल्यानंतर आबूने तक्रारकर्त्याच्या कुटुंबीयांना फोन केला. त्याने तक्रारकर्त्याच्या कुटुंबातील एका महिलेला, तू माझी मोठी बहिण आहे, असे सांगून तक्रार मागे घेण्याची विनवणी केली. आबूचे म्हणणे होते की, त्याला आपल्या भावाचे कृत्य माहिती नव्हते. आपण नाक घासून नागरिकांसमोर माफी मागायला तयार असल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आबूला ओळखणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काही दिवसांपर्यंत आबू आणि त्याचे कुटुंबीय ताजाबादमध्ये दहशत पसरवित होते. आबू नुकताच जनावरांची तस्करीचे मोठे रॅकेट चालवित होता. विदर्भाच्या ग्रामीण भागातून जनावरे खरेदी करून, हैदराबादला पाठविण्यात येतात. या तस्करीत दर महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत होती. आबूच त्याचे संचालन करीत होता. या रॅकेटमध्ये अडथळा आल्यामुळे त्याने महिन्याभरापूर्वी एका व्यक्तीला फोनवर धमकी दिली होती. ती क्लिपिंगही शेकडो नागरिकांनी ऐकली होती. आबूची नुकतीच व्हायरल झालेली क्लिप ऐकून नागरिकांना काही काळासाठी त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. हा गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आबूने आंबेकर, सफेलकर, साहिल सैय्यदसह अनेक गुन्हेगारांची झालेली अवस्था पाहिली आहे.

.........