शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:05 IST

नागपूर-अमरावती महामार्गावर एका कंटेनरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिका कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक राजेंद्र नाईक यांच्या कन्येचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भरधाव कार उभ्या कंटनेरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा करुण अंत झाला. तर, त्यांचे तीन मित्र गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यांमध्ये येथील गुन्हे शाखेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमूख राजेंद्र निकम यांची मुलगी निशा (वय २४) हिचाही समावेश आहे.पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिस्लॉप कॉलेजचे विद्यार्थी निशा राजेंद्र निकम (२१), विशाल रथवानी (२१), सत्या सिंग (२०), दिव्या पकू (२१), धिरज पथाडे (२१), मैत्रेय आवळे (२२), शाहबाज जाफर अलवी (२२) आणि ईव्हाना परवीन खान (वय २२) अमरावतीकडे पार्टीसाठी गेले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास ते तिकडून अर्टिका कार (एमएच ४०/ एसी ९२०१) ने नागपूरकडे परत येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. धावत्या कारमध्ये ते गंमतजंमत करत येत होते. वडधामनाजवळच्या शहनाज हॉटेलसमोर अचानक भरधाव कार उभ्या कंटेनरवर आदळली. त्यामुळे कारच्या दर्शनी भागाची पुरती मोडतोड झाली आणि कारमध्ये बसलेले निशा, विशाल, सत्या, दिव्या तसेच धीरज हे पाच जण जागीच ठार झाले. तर, शाहबाज, ईव्हाना आणि मैत्रेय हे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शाहबाज आणि ईव्हाना यांना मेडीट्रीना तर मैत्रेयला वाडीच्या वेलट्रीट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, २४ तास वर्दळीच्या महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी अल्पावधीतच मोठी गर्दी जमली. वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगाच रांगा लागल्या त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.अपघाताची माहिती कळताच वाडीचे ठाणेदार नरेंद्र पवार आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहचले. निशा, विशाल, सत्या, दिव्या आणि धीरजला मेयोत नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळी जमलेली गर्दी दूर करून वाहतूक सुरळीत केली.मृत निशा निकम गुन्हे शाखेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमूख असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांची मुलगी होय. निकम हे कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याचे कळताच मोठ्या प्रमाणात निकम यांचे आप्तस्वकिय तसेच पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी अपघातस्थळी आणि मेयोत पोहचले. सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारीही घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींचीही भेट घेतली. वृत्त लिहस्तोवर मेयोत मृतांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी पोहचली होती. विविध महाविद्यालयातील तरुण आणि तरुणींनीही तेथे गर्दी केली. जीवाभावाचे मित्र अपघातात गेल्यामुळे त्यांचा प्रचंड आक्रोश सुरू होता.

टॅग्स :Accidentअपघात