शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

गुजरात निकालानंतर राज्यातील आमदारांना संघाचे ‘बौद्धिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 21:33 IST

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी व महाराष्ट्रातील निवडणुकांत विकासाची ठोस कामे घेऊन जाता आले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे. या मुद्यावरच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या मंत्री-आमदारांना संघातर्फे विशेष ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१९ किंवा २० डिसेंबरचा मुहूर्त : मुख्यमंत्रीदेखील होणार सहभागी

आॅनलाईन लोकमतनागपूर : गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी व महाराष्ट्रातील निवडणुकांत विकासाची ठोस कामे घेऊन जाता आले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे. या मुद्यावरच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या मंत्री-आमदारांना संघातर्फे विशेष ‘बौद्धिक’ देण्यात येणार आहे. गुजरात निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच १९ किंवा २० डिसेंबर रोजी हा ‘उद्बोधन वर्ग’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मागील तीन वर्षांपासून संघातर्फे आमदार व मंत्र्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यात आली होती. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपुरात आले आहेत. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांसाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. शक्यतो १९ डिसेंबर रोजीच रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यावेळी आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. मागील वर्षी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मार्गदर्शन केले होते. मात्र यंदा नेमके कोण मार्गदर्शन करणार याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.ही तर नियमित भेट : बापटयासंदर्भात राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी १९ डिसेंबर रोजी या वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. संघस्थानावर भाजप आमदारांची श्रद्धा आहे व तेथे एकत्रित जाण्याची संधी आमदारांना या माध्यमातून मिळते. ही नियमित भेट असल्याचे त्यांनी सांगितले.जनतेच्या अपेक्षापूर्तीसंदर्भात सूचना देणारमागील काही काळापासून भाजपाचे काही आमदार व मंत्र्यांबाबत जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विरोधकांकडूनदेखील आक्रमक भूमिका घेण्यात आली असून विधिमंडळात याचे प्रत्यंतर येत आहे. २०१९ च्या निवडणुकांना फार कालावधी राहिलेला नाही. अशा स्थितीत जनप्रतिनिधींनी जनतेमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने काम केले पाहिजे, असे संघाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. यासंदर्भातच संघाकडून आमदारांशी संवाद साधण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोबतच भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, यावर उद्बोधन वर्गाचा भर राहणार आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMLAआमदार