शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

पॉलिहाऊस, शेडनेटच्या प्रलोभनात शेकडो शेतकरी देशोधडीला; बॅंकेच्या कर्जासाठी घर, शेती विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 11:37 IST

सरकार, कृषी विभागाने माथी मारली याेजना

निशांत वानखेडे/अभिनय खाेपडे

नागपूर : दुप्पट उत्पन्न आणि सबसिडीचे प्रलाेभन दाखवून शेतकऱ्यांच्या माथी मारलेल्या शेडनेट, पाॅलिहाऊस याेजनेने विदर्भातील शेकडाे शेतकऱ्यांना देशाेधडीला लावले आहे. विशेष म्हणजे, तरुण शेतकऱ्यांनी माेठ्या संख्येने ही याेजना स्वीकारली हाेती. मात्र, या याेजनेत लाभ हाेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या डाेक्यावर बॅंकांच्या कर्जाचा डाेंगर चढला असून, ते भरण्यासाठी त्यांच्यावर घरदार, शेती विकण्याची पाळी आली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यासारखे टाेकाचे पाऊल उचलले आहे.

कृषी खात्याच्या याेजनेंतर्गत शेतात पाॅलिहाऊस, शेडनेट लावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना आपल्या व्यथा मांडल्या.

घाेराड (ता. सेलू, जिल्हा वर्धा) येथील विठ्ठल वानाेडे यांनी सांगितले, २०१४- १५ मध्ये कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पाॅलिहाऊसचे महत्त्व सांगितले. नाेकरी साेडून घरची अडीच एकर शेती कसायला लागलेले विठ्ठल या याेजनेकडे आकर्षित झाले. त्यांनी ४० लाखांचे कर्ज काढून एका एकरात पाॅलिहाऊस लावून घेतले. यासाठी त्यांनी शासनाच्या याेजनेंतर्गत पुण्यात जाऊन प्रशिक्षणही घेतले.

कृषी अधिकाऱ्यांनी वानाेडे यांना कार्नेशियन व जरबेरा फुले लावण्याचा सल्ला दिला हाेता. त्यांनी पुण्यातील कंपनीकडून प्रती राेप १० रुपये या दराने ५.५० लाख रुपयांची ५२ हजार कार्नेशियन फुलाची राेपे, तर ३३ रुपये प्रती राेप दराने ४.५० लाखांची १२,६०० जरबेरा फुलाची राेपे आणली आणि दाेन्ही फुलांची राेपे एका एकरात पाॅलिहाऊसमध्ये लावली. मात्र, दाेनच महिन्यांत एका एकरातील पूर्ण राेपे उष्णतेने जळून गेली. विठ्ठल वानाेडे यांच्या डाेळ्यात अश्रूंशिवाय काहीच उरले नाही. यात हाती काही न लागता डाेक्यावर ५० लाखांचे कर्ज चढले. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी खासगी बॅंकेकडून १२ लक्ष रुपयांचे कर्ज काढले. सहा वर्षांत सरकारी बॅंकेचे ७२ लाख आणि खासगी मिळून ९० लक्ष रुपये कर्जाचा डाेंगर चढला आहे.

५० टक्क्यांऐवजी २५ टक्केच सबसिडी

शासनाने याेजना देतेवेळी कर्जावर ५० टक्के सबसिडी मिळण्याचे प्रलाेभन दाखविले हाेते. मात्र, प्रत्यक्षात सबसिडी मिळाली केवळ २० ते २५ टक्के. ती मिळायलाही अडीच वर्षांचा काळ लाेटला व ताेपर्यंत मूळ कर्जावर व्याजावर व्याज चढले हाेते.

धक्क्याने वडिलांचा मृत्यू

वर्ष उलटताच बॅंकेने कर्ज फेडण्यासाठी तगादा लावणे सुरू केले. बॅंकेचे अधिकारी घरी येऊ लागले. अडीच एकर शेती विकूनही डाेंगराएवढे कर्ज फेडणे शक्य नव्हते. त्यामुळे बॅंकेने वानाेडे यांची गॅरंटी घेतलेल्यांनाही त्रास देणे सुरू केले. कुणाची शेती, कुणाचे घर निलामी काढण्याचे पत्र पाठविण्यात आले. हा सगळा प्रकार हाेताना पाहून धक्क्याने २०१९ मध्ये वडील बापूराव वानाेडे यांचा मृत्यू झाल्याचे विठ्ठल यांनी सांगितले.

जिल्ह्यात १० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अनेकदा वानाेडे यांनाही आत्महत्या करण्याचा विचार आला; पण आपल्यानंतर कुटुंबाचे हाल हाेतील, या विचाराने एम.ए. शिकलेल्या वानाेडे यांनी आत्महत्येचा विचार साेडून दिला. मात्र, याविराेधात लढण्याचा निर्धार केला. त्यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भ व महाराष्ट्रातील पाॅलिहाऊस याेजना स्वीकारलेल्या शेतकऱ्यांची यादी काढली. ही संख्या १,२०० च्या घरात आहे. त्यांच्या जिल्ह्यात ११० शेतकऱ्यांनी या याेजनेत कर्ज घेतले हाेते. कुणी १० गुंठ्यांसाठी १२ लाख, कुणी २०, ३०, ५० लाखांपर्यंत कर्ज घेतले आहे. त्या सर्वांवर चढलेल्या कर्जाची यादी त्यांनी ‘लाेकमत’ला दिली आहे. यातील १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी