शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

प्रकल्पग्रस्तांना हवा निवारा

By admin | Published: May 09, 2016 2:57 AM

तालुक्यातील सालेभट्टी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात आले.

गाव सोडण्याची तयारी : सालेभट्टी येथे केवळ सहा कुटुंब वास्तव्यालाशरद मिरे भिवापूर तालुक्यातील सालेभट्टी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. गावात पूर्वी ४०० कुटुंब वास्तव्याला होती. त्यातील सहा कुटुंब वगळता इतरांनी पुनर्वसित गावात राहायला सुरुवात केली. या सहा कुटुंबांनी आता गाव सोडण्याची तयारी दर्शविली असून, घराचे बांधकाम होईपर्यंत प्रशासनाने त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ‘गाव सोडणार नाही’ या भूमिकेवर प्रकल्पग्रस्त अडून होते. कालांतराने या प्रकल्पग्रस्तांनी हळूहळू गाव सोडायला सुरुवात केली. सालेभट्टी येथील सहा कुटुंबाने गावात राहणे पसंत केले. गावाला उद्भवणारा धोक ा विचारात घेता प्रशासनाने या गावातील वीजपुरवठा बंद केला. त्यात गावातील शाळा, दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, स्वस्त धान्याचे दुकान पुनवर्सित स्थळी स्थानांतरित करण्यात आले. दोन वर्षापासून येथील बहुतांश घरांमध्ये कुणीही राहात नाही. नागरिकांनी गाव सोडताच घराच्या खिडक्या, दारे व इतर साहित्य काढून नेले. त्यामुळे गावात केवळ पडक्य भिंती नजरेस पडतात. परिणामी, संपूर्ण गाव भकास झाले आहे. दरम्यान, अविनाश नाईक, शामराव ठाकरे, प्रवीण बहादुरे, तानाबाई खरकाळे, सुमन कांबळी, अरुण वरखडे या सहा कुटुंबातील २० सदस्यांनी गाव सोडण्याची तयारी दर्शविली. घराचे बांधकाम होईपर्यंत आमच्या निवाऱ्याची सोय करा, एवढी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या निर्जन गावात ८० वर्षीय दशरथ मोटघरे यांची चहाची टपरी आहे. गावात दुभती जनावरे नसल्याने दूध मिळत नाही. त्यामुळे ते ‘ब्लॅक टी’ विकतात. दिवसभरात केवळ २० हाफ चहाची विक्री होते. कारण गावात फक्त २० च माणसं राहतात. एखादा साहेब आलाच तर अपवाद, अशी माहिती मोटघरे यांनी दिली. गावातील माणसं आपाापल्या घरी चहा पिऊ शकतात. पण, मोटघरे यांना रोजगार मिळावा म्हणून, ते रोज चहा मोटघरे यांच्या टपरीवर चहा पिणे पसंत करतात.अवनीची घुसमट‘अवनी’ ही दीड वर्षाची आहे. गावात तिच्यासोबत खेळायला कुणीही समवयस्क नाहीत. त्यामुळे ती दिवसभर प्राण्यांसोबत खेळत कसातरी दिवस घालविते. वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्यावेळी सर्वत्र अंधार असतो. त्यामुळे अवनी घाबरते. या ‘चिमुकल्यांसाठी आम्हाला गाव सोडायचं आहे’ अशी प्रतिक्रिया अवनीचे वडील अविनाश नाईक यांनी व्यक्त केली.अन् त्यांना मिळाला दिलासाया विदारक वास्तवाची माहिती मिळताचं सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी रविवारी या सहाही कुटुंबीयांची सालेभट्टी येथे जाऊन भेट घेतली. अख्खे गाव फिरल्यानंतर दार नसलेल्या एका झोपडीत पाळणा हलताना दिसला. पाळण्यात सहा महिन्यांचा चिमुकला झोपला होता. आवाज दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. तासाभरानंतर गावातील सहाही कुटुंबातील सदस्य गोळा झाले. त्यांनी त्यांची व्यथा राजू पारवे यांच्या समक्ष कथन केली. हा तिढा सोडविण्यासाठी आपण सोमवारी तहसीलदारांची भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी या प्रकल्पग्रस्तांना दिली. यावेळी कृष्णा घोडेस्वार, रमेश भजभुजे, देवेंद्र देशमुख उपस्थित होते.