शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

कमी पटसंख्येच्या शाळेसाठी धोक्याची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:30 PM

राज्यात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे शैक्षणिक सत्र ढवळून निघत आहे. शाळा कधी सुरू होणार यासंदर्भात कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

ठळक मुद्देराज्यात १० पेक्षा कमी पट असलेल्या ४६९० शाळा

मंगेश व्यवहारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे शैक्षणिक सत्र ढवळून निघत आहे. शाळा कधी सुरू होणार यासंदर्भात कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या ४६९० शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या १० पेक्षा कमी आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, शिक्षण क्षेत्रावर खर्च होणारे बजेट लक्षात घेता कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ही धोक्याची घंटा आहे.मिळालेल्या माहितीनुसार कमी पटसंख्येच्या नावावर राज्यातील तब्बल ४६९० शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडून तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्य शासनाच्या बजेटमधून शिक्षणावर ४६ हजार कोटी रुपये खर्च होतात. यातील शिक्षकांच्या वेतनावर मोठा निधी खर्च होतो. त्यामुळे शासन १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा गुंडाळण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसत आहे. पण दुसरी एक बाजू म्हणजे यातील बहुतेक शाळा या दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. ज्यामध्ये शिकणारे विद्यार्थी हे गोरगरीब पालकांची मुले आहेत. तेथील विद्यार्थ्यांकरिता जवळपासच्या परिसरात शिक्षणाची दुसरी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा गावात आजही ना पक्के रस्ते आहेत ना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता आहे. बालकांच्या शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार इयत्ता १ ते ५ मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक बालकाला १ कि.मी. अंतराच्या आत आणि इयत्ता ६ ते ८ मध्ये शिकणाºया बालकांना ३ कि.मी.च्या आत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असून प्रत्येक बालकाचा तो मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकांना गाव व गावाच्या परिसरातच शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे सरकारला बंधनकारक ठरते. त्यामुळे शासनाचे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर लोटण्याचे आहे, अशी भीती शिक्षक संघटना व्यक्त करीत आहे.- या सर्व शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागातील असून तेथे शिकणारे विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबातील आहे. परिसरातील शाळा मोडित निघाली तर दुसरीकडे शिकायला जाणे ही बाब या मुलांना भौगोलिक, भौतिक, सामाजिक व आर्थिक कोणत्याच दृष्टीने सोयीची नाही. अशावेळी या शाळा बंद करणे म्हणजे मुलांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणे आहे.- लीलाधर ठाकरे,जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत काहीही निर्णय नाहीकमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार का? यासंदर्भात शिक्षण विभागात विचारणा केली असता, यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. शासनाने जिल्ह्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागितली होती ती आम्ही दिली आहे. समायोजनासंदर्भात कुठलाही निर्णय नाही.

- विविध जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळानागपूर जिल्ह्यातील १२८, अहमदनगर- ९२, अकोला- ५५, अमरावती - १२१, औरंगाबाद - ६२, भंडारा- २९, बीड - १०२, बुलडाणा -२४, चंद्रपूर -१३३, धुळे -१२, गडचिरोली -३८४, गोंदिया - ६३, हिंगोली -३०, जळगाव - २१, जालना -२६, कोल्हापूर - १४१, लातूर -५४, नांदेड -१३३, नंदूरबार -३३, नाशिक - ९४, उस्मानाबाद -२७, परभणी -२८, पालघर -६०, पुणे -३७८, रायगड -५७३, रत्नागिरी -७००, सांगली -७७, सातारा -३७०, सिंधुदुर्ग -४४१, सोलापूर -४४, ठाणे - ७२, वर्धा -७३, वाशिम -२८, यवतमाळ -७९

 

टॅग्स :Schoolशाळा